Category Archives: Uncategorized

खरा शेक्सपिअर कोण?

रेडवुड सिटी

शेक्सपिअरविषयी तोंड भरभरून लिहिले जाते; आणि इतके बोलले लिहिले गेल्यावरही शेक्सपिअरची नाटके त्यांनी लिहिलीच नाहीत ; दुसऱ्याच कुणीतरी ती लिहिली आहेत, असे म्हणणारे अनेक संशोधक समीक्षक लेखक आहेत. त्याच्यावर जितके गौरवपर लिहिले जाते तसे “शेक्सपिअर” हा दुसराच कोणीतरी असावा ही शंकाही कायम व्यक्त केली जाते. इतके रामायण ऐकल्यावर रामाची सीता कोण? असा प्रश्न विचारणाऱ्यांइतके हे टीकाकार अनभिज्ञ नाहीत. खरा “शेक्सपिअर” कोण असावा असे वाटणारे अंदाजे पन्नास उमेदवार तरी ‘बाशिंग’ बांधलेले आढळतात. पण त्यापैकी अनेक जणांच्या पात्रतेबद्दल लगेच आक्षेप घेता येतात त्यामुळे ते बहुसंख्य आपोआप स्वयंवर मंडपातून बाहेर जातात!

शेक्सपिअरची नाटके ही शेक्सपिरने लिहिलीच नाहीत असे ठामपणे सांगणारी थोडी थोडकी नाही तर पाचहजारांच्यावर पुस्तके आहेत! शेक्सपिअरची नाटके वाचल्यावर कायदा , वैद्यकीय ज्ञान, राजकीय बाबी, मुत्सद्दीपणा, कोर्टातील कामकाज, ल्ष्करी घडामोडी, ह्या व इतर अनेक गोष्टींचे ज्ञान असलेल्या माणसाने, विविध क्षेत्रातील तज्ञाने लिहिली असावीत ही खात्री वाटते. पण एकच व्यक्ति इतक्या निरनिराळ्या व परस्परांत फारसा संबंध नसलेल्या विषयात तज्ञ असणे शक्य नाही हेही माहित असते. त्यातूनच पुढे कुणा एका लेखकाने ही नाटके लिहिली नसावीतहा विचार बळावतो.त्या दृष्टीनेही हे संभाव्य लेखक कोण ह्यावर तर्कवितर्क होऊन पुस्तके लिहिली गेली आहेत. शेक्सपिअर हा लेखक नसावा ही शंका येण्यामागे आणखी एक मोठे महत्वाचे व व्यवहारात नेहमीच्या समजांवर आधारलेले कारणही असावे. ते म्हणजे शेक्सपिअर हा खेडेगावात वाढलेला, तिथेच शिकलेला ही पार्श्वभूमी असलेला. बरे जग पाहिलेला, किंवा ह्या अगोदर लिखाण केलेला,साहित्य प्रसिद्ध झालेला किंवा साहित्यिक वर्तुळात माहित असलेला असाही तो नव्हता. केंब्रिज किंवा आॅक्सफर्ड मध्ये शिकलेला तर नव्हताच नव्हता. नेहमीच्या वापरातील शब्द वापरायचा तर असा गावंढळ माणूस इतक्या तोलामोलाची एक दोन नाही तर ३६-३७ नाटके नाटके लिहिलच कसा? असा अनेक संशोधकाचा संशय आणि मत आहे. कुणा एका बुद्धिमान आणि प्रतिभेची देणगी असलेल्या माणसाचे हे कर्तृत्व असले पाहिजे. राजकीय, सामाजिक कारणांमुळे त्याने आपली नाटके शेक्सपिअरच्या नावाने लिहिली असावीत असे ठाम मत असणारेही आहेत. शेक्सपिअर हा रंगभूमीवर नट म्हणूनही सर्वांना माहित होता. त्याचा साहित्याशी म्हणायचा तर तेव्हढा एक संबंध दाखवता येतो.

अमेरिकेतील पीबीएस ह्या प्रतिष्ठित व विश्वसनीय अशा वाहिनीने १९९६ साली ह्या प्रश्नावर एक तासाचा लघुपट काढला होता. त्यात शेक्सपिअरची समजली जाणारी नाटके शेक्सपिअरची नाहीत हा निष्कर्ष निघतो असे सुचवले आहे. न्यूयाॅर्क टाईम्स्, हार्पर्स मॅगझिन ह्यांनीही हा संशय प्रकट करण्यासाठी पुष्कळ रकाने खर्च केले आहेत. स्मिथ्सोनियन सारख्या मोठ्या संस्थेनेही २००२ साली “शेक्सिअरचा लेखक कोण?” हा मोठा परिसंवाद आयोजित केला होता. पण शेक्सपिअरविरुद्ध लिहिणाऱ्या, आपली मते हिरिरीने मांडणाऱ्या सर्वांचे पुरावे हे तकलादू, परस्परविरोधी आहेत.धूर्तपणणे लोकांच्या भावनेशी खेळण्याची ही एक विद्वत्तापूर्ण पद्धत आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे असा शेक्सपिअरच्या बाजूने बोलणाऱ्यांचा आरोप आहे.

Concordia Univ. आॅरेगन मधील प्रा. डॅनियल राईट हार्पर्स मॅगझिनमधील लेखात म्हणतात, “ शेक्सपिअर हा फारसा शिक्षित नव्हता, लोकर आणि धान्याचा दुकानदार होता.आणि साहित्यिक जगताशीच नाही तर एखाद्या वाड•मय मंडळाशीही संबंधित नव्हता.”पण ही काल्पनिक विधाने आहेत” अशी ह्या आक्षेपांची बोळवण केली जाते. आणि ह्या प्रत्युत्तरात तथ्य आहे. शेक्सपिअर हा स्वत: व्यापारी किंवा दुकानदार नव्हता. त्याचे वडील नगरपरिषदेचे महापौर होते. त्याचे गाव लहान असेल पण महत्वाचे, लोकर व कातड्यांचा व्यापार व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे ते गाव होते. त्याने, शिक्षण त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे पुरेसे आठ वर्षे घेतले होते. हां, त्याला कोणतेही महाविद्यालयीन शिक्षण नव्हते इतके मात्र म्हणता येईल.

History Today हे विद्वानांत व वाचकांतही मान्यता मिळालेले दर्जेदार पुस्तक आहे. त्यामध्ये लेखक विल्यम डी. रुबिन्स्टाईनने लिहिले आहे की,” त्यावेळच्या सर्वमान्य कागदपत्रांत शेक्सपिअरचे नाव आढळत नाही की तो एखाद्या पुस्तकाचा कर्ता, लेखक असाही कोठे उल्लेख दिसत नाही.” ह्या म्हणण्यात थोडेफार तथ्य आहे. पण त्याच्या साॅनेटची एक पुस्तिका प्रकाशित झाली होती. तसेच नाटकांच्या छपाईच्या गर्दीच्या काळात त्याच्या काही नाटकांची quarter books प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली. त्यावर शेक्सपिअरचे कर्ता म्हणून नाव छापले होते हे शेक्सपिअरचे समर्थक दाखवतात. पण त्याही पेक्षा एलिझाबेथ राणीच्या आणि किंग जेम्सच्या काळी राजवाड्यात शेक्सपिरची कंपनी आपली नाटके करत असे. जेम्सच्या काळी तर त्याच्या नाटकांचे राजांसाठी १८७ प्रयोग झाले होते. राजवाड्याच्या दप्तरांत ह्यांची नोंद होत असे. त्या अधिकृत नोंदणींच्या कागदपत्रात विशेषत: १६०४ आणि १६०५ साली शेक्सपिअरच्या नाटकाची नावे व लेखक ह्या कलमात विल्यम शेक्सपिअर असे उल्लेख स्पष्टआढळतात. हे असो; पण शेक्सपिअर विरोधी लेखक, नाटककार ,राॅबर्ट ग्रीन ह्याने आपल्या Groat’s-Worth of Wit ह्या पुस्तकात प्रथम अप्रत्यक्षपणे केवळ एक नट पण नाटककार स्वत:ला नाटककार म्हणवून घेतो असा शेक्सपिअरला टोला मारला आहे ,पण नंतर त्याने तसे म्हटले ही माझी चूक होती असे म्हणत तो एक चांगला नाटककार आहे असेही म्हटले. शेक्सपिअ- तज्ञ, विद्वान जोनथन बेट काय म्हणतो तेही ध्यानात घ्यावे लागेल. तो म्हणतो, “शेक्सपिअरचा मृत्यु होऊन दोनशे वर्षे उलटून जाईपर्यंत शेक्सपिअर हा नाटककार लेखक नव्हता असे कोणीही म्हटले नाही की लिहिलेही नाही!”

शेक्सपिअर हा लेखक किंवा नाटककारही नव्हता असे प्रथम १७८५ साली इंग्लंडमधील वाॅर्विकशायरच्या रेव्हरंड जेम्स विल्माॅटने मत मांडले होते. पण ते कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. १८५० च्या काळापासून अमेरिकेची डेलिया बेकन हिने शेक्सपिअर हा नाटककार नव्हता ह्यावर संशोधन चालू केले होते. शेक्सपिअर हा त्याच्या नाटकांचा लेखक नसून, खरा लेखक सर फ्रान्सिस बेकन आहे असे खळबळजनक विधान ठामपणे करणारी अमेरिकन बाई, डेलिया बेकनला ते श्रेय जाते. तिच्या ह्या मताला राल्फ वुल्डो इमर्सन, वाॅल्ट व्हिटमन, एडगर अॅलन पो, नॅथनियल हाॅथर्न, मार्क ट्वेन, हेलन केलर ह्यासारख्या अमेरिकेतील नामवंत लेखक, कथालेखक,कवि, तत्वज्ञांचा पाठिंबा मिळत गेला. ती १८५३साली इंग्लंडमध्ये ह्या विषयावर संशोधन करायला गेली. जाताना इमर्सनने तिला इंग्लंड मधील लेखक तत्वज्ञ इतिहासकार थाॅमस कार्लाईलला तिची शिफारस करणारे आपले ओळखपत्र दिले होते. कार्लाईलने तिची राहण्याची वगैरे सोय करून दिली शिवाय इंग्लंडमधील विद्वानांची ओळख करून देतो अशीही तयारी दाखवली होती. तिने दोन वर्षे राहून फ्रान्सिस बेकनने ज्या ज्या ठिकाणी काळ व्यतित केला, तिथे जाऊन,राहून अभ्यास केला. पाचवर्षानंतर १८५७ साली ती अमेरिकेत परतली. त्याच वर्षी तिने आपला The philosophy of the Plays of Shakespeare Unfolded हा ६७५ पानांचा भलामोठा ग्रंथ प्रसिद्ध केले. वाचायला अत्यंत कंळवाणाआणि किचकट असे हे पुस्तक आहे. ह्या ६७५ पानात तिने एकदाही शेक्सपिअरच्या नाटकांच्या लेखका संबंधात फ्रान्सिस बेकनचा स्पष्ट उल्लेख केला नाही. पण वाचकांना संदर्भा संदर्भाने बेकन हा त्या नाटकांचा लेखक असावा असा निष्कर्ष काढता येतो.

खरा लेखक कोण किंवा कोणी तीनचारजणांनी मिळून लिहिले ह्या विषयी भाषाशास्त्राचे तज्ञ, भाषाशैलीचे विश्लेषक ह्यांचेही संशोधन चालू होते. ह्यांमध्ये आणखी तज्ञांची भर पडली म्हणजे गुप्त लिपी, भाषा वापरली आहे का ह्याचा अभ्यास सुरू झाला. युद्धात शत्रूचे गुप्तलिपीतील संदेश-पद्धती उघड करणारे तज्ञ असतात. तसे ह्या कामी तेही ह्यात उतरले. Ignatius Donnellyने जी पद्धत वापरून more low or shak’st-spur never writ a word (“शेक्सपिअरने हेलिहिले नसून मार्लोने लिहिला”) असे उघड केले त्याला, रेव्हरंड निकोल्सनने डाॅनेलीचीच पद्धत वापरून “master Will-I-am shak’st -spurr” (विल्यम शेक्सपिअरने लिहिले असे सिद्ध करून, प्रत्युत्तर दिले !

पण प्रसिद्ध तत्वज्ञ, राजकारणी,मुत्सद्दी शास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, सर फ्रान्सिस बेकनने ही नाटके लिहिली नाहीत त्यासाठीचा पुरावा म्हणजे बेकनला नाटके आणि तसले करमणुकीचे प्रकार अजिबात आवडत नव्हते. त्याने आपल्या अनेक निबंधात नाटके आणि तसले साहित्य म्हणजे बौद्धिक सवंगपणा व हीन अभिरुचीचे निदर्शक साहित्य प्रकार आहेत अशी खरमरीत टीका केली आहे !

१९१८ मध्ये गेटशेड (इंग्लंड) येथील शाळेतील शिक्षक जे. थाॅमस लूनीने पडद्याआडचा खरा शेक्सपिअर म्हणजे Earl of Oxford Edward de Vere हा असल्याचे आपल्या Shakespeare Identified ह्या पुस्तकात मांडले. अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हा शेक्सपिअर असण्यासाठी योग्य उमेदवार होता. शिकलेला, हुषार, तसेच कवि आणि नाटककार म्हणूनही ओळखला जात असे. पण वस्तुस्थिती अशी आहे की शेक्सपिअरची कविता,नाटके म्हणून आजही जी ओळखली जातात त्याच्या पासंगालाही ह्या अर्ल आॅफ आॅक्सफर्डच्या कविता नाटके पुरणार नाहीत ! पण त्याची जमेची बाजू म्हणजे त्याने खूप प्रवास केला होता.पुष्कळ जग पाहिले होते. त्याला इटालियन चांगले येत होते. अर्ल असल्यामुळे दरबारी रीतिरिवाज, आणि राजकारणाची उत्तम माहिती होती. या शिवाय बराच काळ तो राणी एलिझाबेथच्या मर्जीतलाही होता.

पण अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हाच शेक्सपिअरचा खरा शेक्सपिअर असण्याबाबत एक महत्वाची शंका आहे. शेक्सपिअरच्या सर्व नाटकांतून धीरगंभीरपणा, खेळकर विनोद, सहृदयता, स्वभावाचा शांत आणि स्थिरपणा तसेच सामान्य व्यवहारी शहाणपण हे जाणवत असते. ह्या सर्व स्वभावविशेषांच्या विरुद्ध अर्ल आॅफ आॅक्सफर्ड होता ! तो उतावळा, शीघ्रकोपी, उद्दाम बेजबाबदार आणि हिंसा करायलाही मागेपुढे न पाहणारा होता. सतरा वर्षाचा असताना त्याने आपल्या घरगड्याला ठार मारले होते. पण अर्ल असल्यामुळे आणि राजदरबारात वजन असल्यामुळे तो सुटला. अशा स्वभाव प्रवृत्तीचा असलेल्या अर्ल आॅफ आॅक्सफर्डने आपणच शेक्स्पिअरचे खरे लेखक आहोत ही बाब गुप्त का ठेवली ह्यावर मात्र जे.थाॅमस लूनीने कोणतेही कारण किंवा पुरावा दिला नाही.

वरील कारणांशिवाय आणखी एक बाब अर्ल आॅफ आॅक्सफर्डच्या विरुद्ध जाते. त्याच्याच आश्रयाखाली एक नाटक कंपनी होती. त्याच कंपनीला त्याने आपली नाटके का दिली नाहीत? ‘लाॅर्ड चेम्बरलेनस् मेन’ह्या शेक्सपिअर काम करत असलेल्या कंपनीला का द्यावीत? त्याचेही उत्तर लूनी आपल्या पुस्तकात देत नाही. (मला वाटते की आपल्याच कंपनीला त्याने ती दिली असती तर त्या नाटकात व्यक्त झालेली राजकीय बाजू ह्यानेच मांडली व हा त्या मतांचा पुरस्कार करतो हे राज्यकर्त्यांना लक्षात येणे सोपे गेले असते!) पण ह्यापेक्षाही अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हा शेक्सपिअर नाही ह्याचा पटण्यासारखा आणखी एक पुरावा म्हणजे हा अर्ल १६०४सालीच मरण पावला होता. आणि शेक्सपिअरची The Tempest , Macbeth इतरही काही नाटके त्या नंतरची आहेत! ह्यावर आॅक्सफर्डवादी म्हणतात की ही नाटके त्याने आपल्या मृत्यु अगोदरच लिहून ठेवली असावीत. किंवा त्या पुस्तकांवर प्रयोगाच्या तारखा चुकीच्या असाव्यात. ही नाटके आॅक्सफर्डच्या अर्लचा मृत्यु होण्यापूर्वी झाली असण्याची शक्यता आहे. ह्या युक्तिवादात थोडे तथ्य आहे. कारण त्या काळी स्पर्धेमुळे प्रयोग लावण्याची जेव्हढी तातडी असे, तेव्हढीच घाई नव्यानेच व झपाट्याने पुढे येत असलेल्या छपाई व प्रकाशनाच्या व्यवसायाला quarter पुस्तके छापून ती लवकरात लवकर प्रसिदध करण्याची घाईसुद्धा तितकीच असे!

दोन्ही बाजूचे म्हणणे काही असो, सर फ्रान्सिस बेकन हाच शेक्सपिअरचा खरा लेखक असावा ह्या मताला जसा थोरामोठ्यांचा पाठिंबा मिळाला तसे Earl of Oxford हाच शेक्सपिअरचा पडद्यामागील खरा लेखक होता असे म्हणणाऱ्यांत नोबेल पारितोषिक विजेता जाॅन गाॅल्सवर्दी, मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राॅईड, प्रख्यात अमेरिकन शेक्सपिरियन नट आॅर्सन वेल्स आणि डेरेक जेकब अशा थोरामोठ्या व्यक्तींनीही आॅक्सफर्डला शेक्सपिअर म्हणून उचलून धरले.

ह्या दोन मोठ्या व्यक्तींच्या पाठोपाठ ‘खरा शेक्सपिअर हाच’ म्हणून शेक्सपिअरचा समकालीन प्रसिद्ध नाटककार ख्रिस्टोफर मार्लोचे नाव पुढे येते.पण त्याच्या नावाला फार कुणाचा पाठिंबा मिळाला नाही.

त्यानंतर एक जबरदस्त आणि अनुरुप नाव समोर आले ते म्हणजे मेरी सिडनी, Countess of Pembroke,
हिचे. ही खरी शेक्सपिअर असली पाहिजे अशी चर्चा सुरु झाली. मेरी सिडनीवादी संशोधकांचा युक्तिवाद असा की शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह First Folio हा अर्ल आॅफ पेम्ब्रोक आणि माॅन्टगोमरी ह्यांना अर्पण करण्यात आला आहे. हे दोघेही काउन्टेस मेरी सिडनीची मुले! ह्या काऊन्टेसचे घर जमीनजुमला मिळकत स्ट्रॅटफर्ड येथेच म्हणजे शेक्सपिअरच्या गावीच होती! वरील दोन गोष्टींमुळे ती शेक्सपिअर असण्याची दाट शक्यता आहे असे मानले जाते. तिची बाजू आणखी भक्कम करतात ते मुद्देही लक्षात घ्यावे लागतील असेच आहेत. ती चांगली शिकलेली, विद्वान आणि सुंदर होती. तिचा भाऊसुद्धा कवि होता. तसेच तिचे काका राॅबर्ट डड्ले हेसुद्धा अर्ल होते. साहित्यिकांत तिच्या चांगल्या ओळखी होत्या.Edmund Spenser सारख्या कवीने आपली कविताही तिला अर्पण केली आहे. पण साहित्याची आवड असूनही तिचे स्वत:चे असे काहीही साहित्यिक लेखन नाही. त्यामुळेही तिचे नाव नंतर ह्या स्पर्धेतून मागे पडले.

एक मतप्रवाह असा आहे की शेक्सपिअर, कायदा, राजदरबार व राजकारण, न्यायालयीन कामकाज,वैद्यक आणि इतर अनेक लहान मोठ्या क्षेत्राचे इतके चौफेर ज्ञान असलेला एकच चतुरस्त्र माणुस असणे शक्य नाही. चार पाच प्रतिभावान, तज्ञ, जाणकारांनी मिळून ती नाटके लिहिली असण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यासाठी अनेक नावे समोर येतात. Countess of Pembroke उर्फ मेरी सिडनी, तिचा भाऊ सर फिलिप सिडनी, सर फ्रन्सिस बेकन, सर वाॅल्टर रॅले. पण ह्या मताला आणि नावांना पुष्टी देणारा पुरावा मिळत नाही. शिवाय इतक्या व्यक्ति ह्यामध्ये गोवल्या असतील तर ही माणसे इतकी वर्षे हे गुपित कसे राखू शकतील? अशक्य.

शेक्सपिअर हा नाटककार होता की नाही? शेक्सपिअरच्या नावाने ही नाटके लिहिणारा खरा लेखक कोण? ह्या प्रश्नाचे संशोधन करणारी व आपापले “खरा शेक्सपिअर “कोण हे सांगणाऱ्या पाच हजाराच्या वर पुस्तकातून सुमारे पन्नास नावे समोर येतात. त्या पुस्तकातील मते, प्रमेये, शंका, चर्चा यामध्ये एक ठळक व समान विचार असा की, शेक्सपिअरची शिक्षणासहित एकूण पार्श्वभूमी पाहिली आणि त्याची व्यक्ति म्हणून अशी फारशी माहितीही आढळत नाही, त्यावरून शेक्सपिअर येव्हढा बुद्धिमान व इतका प्रतिभशाली असणे शक्य नाही ! त्यामुळे ही उत्कृष्ठ नाटके त्याने लिहिलीच नसावीत. ह्या मतांतूनच किंवा शिक्षण, शहरे, खेडेगाव ह्या संबंधातील पूर्वग्रहातून त्याच्याविषयी हे संशयाचे मोहोळ उठले असावे.

शेक्सपिअर हा अशिक्षित, गावंढळ नव्हता. अगदी सामान्य घरातलाही नव्हता. त्याच्या वडलांचा व्यापार-व्यवसाय होता. आपला स्वभाव, व्यवहार कुशलता, बुद्धिचातुर्य, ह्यामुळे लोकांचा पाठिंबा असलेली ती व्यक्ति होती. गावचे ते नगराध्यक्ष होते. म्हणजे शेक्सपिअर गावात प्रतिष्ठा असलेल्या घरातील होता. आणि असा काही निसर्ग-नियम किंवा कोणी राज्यकर्त्याने कायद्याने बनवलेला नियम आहे की लेखक, साहित्यिक, व्यापारी, उद्योजक किंवा कलावंत होण्यासाठी उच्च शिक्षण आणि किंवा थोरा मोठ्यांचे घराणेच हवे ! पाश्चात्य देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातीलही बऱ्याच प्रतिभावंत लेखक कवींची नावे वाचल्यावर कोणत्याही कलेसाठी आणि त्यात नामवंत प्रख्यात होण्यासाठी उच्चच काय फारसे शिक्षण हवे असे बंधन नाही.सर्जनशीलतेला ह्या अटी लागू होत नाहीत!

सर्वकालीन श्रेष्ठ मानले जाणारे रशियन कादंबरीकार फ्योडोर दोस्ताव्हस्की, मॅक्झिम गाॅर्की कोणत्या काॅलेजात गेले होते.? गाॅर्कील् तर शाळा माहितही नव्हती. आजही त्यांची Crime and Punishment, Brothers Karamazov किंवाMy Childhood, My University Days, ही पुस्तके व Mother ह्या कादंबऱ्या वाचल्या जातात; अभ्यासल्या जातात. पोर्च्युगीज लेखक होझे सेरामागो( Saramago) ह्याला गरीबीमुळे मध्येच शाळा सोडावी लागली. तो यंत्र-दुरुस्तीचे काम शिकला. कामंही करु लागला. पण खरी आवड लिहिण्याची होती. लिहित राहिला. त्याच्या बऱ्याच कादंबऱ्यामुळे त्याचे परदेशातही नाव झाले; त्या वाचकप्रियही झाल्या, आणि १९९६ साली त्याला वाड.मयाचे नोबेल पारितोषिकही मिळाले! ह्या लेखकांसारखे आमचे श्रेष्ठ कवि, शाहिर, कादंबरीकार नारायण सुर्वे, शाहिर अण्णाभाऊ साठे ह्यांनी शाळेचा उंबरा पाहिला असेल नसेल पण तेही उघड्या जगाच्या बिनभिंतीच्या विद्यापीठातच शिकले. आधुनिक वाल्मिकी, प्रतिभावान कवि, चित्रपटकथा लेखक, श्रेष्ठ गीतकार, गदिमाआणि त्यांचे तितकेच उत्तम कथाकार, बनगरवाडी सारखी जागतिक दर्ज्याची कादंबरी लिहिणारे, माणदेशी माणसं सारखी अस्सल देशी लेणे ठरलेली,शब्दसामर्थ्याने सामान्यांना असामान्य बनवणारे भाऊ, व्यंकटेश माडगूळकर ह्यांनी हायस्कूल पाहिलेही नाही! लक्ष्मीबाई टिळक लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मुळाक्षरे लिहायला शिकल्या. त्यातूनच “स्मृतिचित्रे” सारखे आठवणीवजा अजरामर आत्मचरित्र निर्माण झाले. कितीजणांची नावे घ्यायची, आपल्या कडील किंवा परदेशातील प्रतिभावंतांची! उच्च शिक्षण नाही, खेडेगावातला म्हणून शेक्सपिअची नाटके त्याची नव्हेतच ह्या आक्षेपाला तसा काहीही अर्थ नाही.

शेक्सपिअरची बालपणापासून ते१८-२० वर्षे ज्या लहान गावात गेली ते अनुभव, ते दिवस, त्याच्या नाटकातही दिसतात. जोनाथन बेटने Cymbeline नाटकातील उदघृत कलेले शेक्सपिअरचे दोन ओळीचे काव्य पहा- “Golden lads and girls all must/ As chimney sweepers, come to dust ,” ह्या ओळींना आणखी वजन येते जेव्हा आपल्या लक्षात येते की वाॅर्विकशायरमध्ये सोळाव्या शतकात डॅंडलियनचे फुल येताना त्याला golden lad म्हणतआणि त्याच्या बिया इतस्तत: पसरणारा तो धुराडे स्वच्छ करणारा असतो. हे संदर्भ कोण वापरेल.? खेड्यात वाढलेला की राजवाड्यात, दरबारातच ज्याचा वावर असलेला? तसेच जेव्हा फाॅलस्टाफ ( सर जाॅन फाॅलस्टाफ ही व्यक्तिरेखा Henry IV part 1 आणि २मध्ये आहे.) आपल्याविषयी, as a boy I was small enough to creep into any alderman’s thumb ring” सांगतो तेव्हा हा अतिशयोक्त दृष्टान्त कुणाल सुचेल? एखाद्या सरदाराच्या मुलाला का ज्याचे वडीलच नगरपरिषदेचे (alderman) सभासद, उपमहापौर, महापौर होते त्या शेक्सपिअरला? शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्डमध्ये मेंढ्यांची लोकर व कातडे ह्यांचा बाजार भरत असे. त्या पासून निरनिराळ्या वस्तु बनविण्याचा उद्योगही तिथे चालत असे. त्यामुळे त्याला ह्या वस्तूंची, त्या कशा बनवतात त्याची स्वाभाविकच माहिती होती. त्याच्या नाटकात बरेच वेळा Skin greasy fells, ( मेंढ्याच्या लोकरी चा थर, त्या खालची कातडी, त्याचा अातील थर,) neat’s oil ( कातडे कमावण्यासाठी, मऊ पडावे ह्यासाठी चरबीपासून केलेले तेल; जुना मूळ अर्थ गाय, जनावरे) चर्मकाराच्या बोलण्यात येणारे शब्द येतात.आणि त्याला हेसुद्धा माहित होते की lute string(तंतू वाद्य व त्याच्या तारा) ह्या गाईच्या आतड्यांपासून करतात तर bow string घोड्याच्या केसाचे असतात! त्याचे वडीलही कातड्याचे हातमोजे पायमोजे वगैरे वस्तू तयार करण्यात वाकबगार होते. अशा तऱ्हेने त्याचे स्ट्रॅटफर्ड गाव ह्या ना त्या रुपात त्याच्या अनेक नाटकात डोकावत असते. सुखवस्तु शहरी पांढरपेशांना हे जमेल का? इथे आपल्याला व्यंकटेश, आणि गदिमा किंवा नारायण सुर्वे ह्यांच्या लिखाणाची आठवण येते.

सर्व रसिक वाचकांना, नाटकवेड्या प्रेक्षकांना, शेक्सपिअरच्या किंवा त्याच्या नाटकांच्या चाहत्यांना शेक्सपिअर कोण होता, तो खरा होता की दुसराच कोणी लेखक होता ह्यापेक्षा त्याच्या हॅम्लेट, रोमियो ज्युलिएट काॅमेडी आॅफ एरर्स, आॅथेल्लो अाणि इतर गाजलेली नाटके पाहण्यात, वाचण्यात, त्यातील खलनायक इयागो(Iago) जेव्हा माणसाचे गुण सद्गुणाविषयी बोलतो, A Virtue ! a fig ! ‘Tis in ourselves that we are thus or thus. Bodies are our gardens, to which our wills are gardeners…. If the balance of our lives had not one scale of reason to poise another of sensuality the blood and baseness of our natures would conduct us to most preposterous conclusions; but we have reason to cool our raging motions,..” अशी स्वगते ऐकताना हे खलनायकाचे विचार? असे वाटू लागते. त्याने दिलेली, “Some are born great,
some achieve greatness , and some have greatness thrust upon them !” किंवा जगातल्या सर्व प्रेमिकांचा अनुभव सांगणारे सार , The course of true love never did run smooth !” अशा रुढ केलेल्या सुभाषितांसारख्या वाक्यांचा रसास्वाद घेण्यात खरा आनंद आहे. आणि तो आनंद अक्षय टिकणारा आहे.
शेक्सपिअरसंबंधी झालेले इतके वाद चर्चा वाचल्यावर आपण सामान्य वाचक आणि त्याचे चाहते त्याच्याप्रमाणेच अखेर “जग ही एक रंगभूमीच आहे. ज्याला जी भूमिका मिळाली त्याला ती करावी लागते” काही श्रेष्ठ नटांना कधी दुहेरी भूमिका करण्याचीही संधी मिळते तसे शेक्सपिअरचे झाले असावे. काय सांगावे!

ज्युलियेट म्हणते त्याप्रमाणे “ नावात काय आहे? गुलाबाला दुसऱ्या कोणत्याही नावाने ओळखले तरी त्याचा मधुर सुगंध तोच असतो!” शेक्सपिअर कोणत्याही नावाने ओळखला गेला तरी त्याच्या नाटकातील प्रतिभा- सामर्थ्य, भाषासौदर्य, त्याचे भाषा प्रभुत्व, प्रभावी संवाद, काव्य, मानवी स्वभावाचे सत्य याची मोहिनी रसिकांवर निरंतर चिरकाल राहिल!

खरा शेक्सपिअर कोण?

रेडवुड सिटी

शेक्सिअरविषयी इतके तोंड भरभरून लिहिले जाते, त्याच्याविषयी इतके बोलले लिहिले गेल्यावरही शेक्सपिअरची नाटके त्यांनी लिहिलीच नाहीत ;
दुसऱ्याच कुणीतरी ती लिहिली आहेत, असे म्हणणारे अनेक संशोधक समीक्षक लेखक आहेत. त्याच्यावर जितके गौरवपर लिहिले जाते तसे “शेक्सपिअर” हा दुसराच कोणीतरी असावा ही शंकाही कायम व्यक्त केली जाते. इतके रामायण ऐकल्यावर रामाची सीता कोण? असा प्रश्न विचारणाऱ्यांइतके हे टीकाकार अनभिज्ञ नाहीत. खरा “शेक्सपिअर” कोण असावा असे वाटणारे अंदाजे पन्नास उमेदवार तरी ‘बाशिंग’ बांधलेले आढळतात. पण त्यापैकी अनेक जणांच्या पात्रतेबद्दल लगेच आक्षेप घेता येतात त्यामुळे ते बहुसंख्य आपोआप स्वयंवर मंडपातून बाहेर जातात!

शेक्सपिअरची नाटके ही शेक्सपिरने लिहिलीच नाहीत असे ठामपणे सांगणारी थोडी थोडकी नाही तर पाचहजारांच्यावर पुस्तके आहेत! शेक्सपिअरची नाटके वाचल्यावर कायदा , वैद्यकीय ज्ञान, राजकीय बाबी, मुत्सद्दीपणा, कोर्टातील कामकाज, ल्ष्करी घडामोडी, ह्या व इतर अनेक गोष्टींचे ज्ञान असलेल्या माणसाने, विविध क्षेत्रातील तज्ञाने लिहिली असावीत ही खात्री वाटते. पण एकच व्यक्ति इतक्या निरनिराळ्या व परस्परांत फारसा संबंध नसलेल्या विषयात तज्ञ असणे शक्य नाही हेही माहित असते. त्यातूनच पुढे कुणा एका लेखकाने ही नाटके लिहिली नसावीतहा विचार बळावतो.त्या दृष्टीनेही हे संभाव्य लेखक कोण ह्यावर तर्कवितर्क होऊन पुस्तके लिहिली गेली आहेत. शेक्सपिअर हा लेखक नसावा ही शंका येण्यामागे आणखी एक मोठे महत्वाचे व व्यवहारात नेहमीच्या समजांवर आधारलेले कारणही असावे. ते म्हणजे शेक्सपिअर हा खेडेगावात वाढलेला, तिथेच शिकलेला ही पार्श्वभूमी असलेला. बरे जग पाहिलेला, किंवा ह्या अगोदर लिखाण केलेला,साहित्य प्रसिद्ध झालेला किंवा साहित्यिक वर्तुळात माहित असलेला असाही तो नव्हता. केंब्रिज किंवा आॅक्सफर्ड मध्ये शिकलेला तर नव्हताच नव्हता. नेहमीच्या वापरातील शब्द वापरायचा तर असा गावंढळ माणूस इतक्या तोलामोलाची एक दोन नाही तर ३६-३७ नाटके नाटके लिहिलच कसा? असा अनेक संशोधकाचा संशय आणि मत आहे. कुणा एका बुद्धिमान आणि प्रतिभेची देणगी असलेल्या माणसाचे हे कर्तृत्व असले पाहिजे. राजकीय, सामाजिक कारणांमुळे त्याने आपली नाटके शेक्सपिअरच्या नावाने लिहिली असावीत असे ठाम मत असणारेही आहेत. शेक्सपिअर हा रंगभूमीवर नट म्हणूनही सर्वांना माहित होता. त्याचा साहित्याशी म्हणायचा तर तेव्हढा एक संबंध दाखवता येतो.

अमेरिकेतील पीबीएस ह्या प्रतिष्ठित व विश्वसनीय अशा वाहिनीने १९९६ साली ह्या प्रश्नावर एक तासाचा लघुपट काढला होता. त्यात शेक्सपिअरची समजली जाणारी नाटके शेक्सपिअरची नाहीत हा निष्कर्ष निघतो असे सुचवले आहे. न्यूयाॅर्क टाईम्स्, हार्पर्स मॅगझिन ह्यांनीही हा संशय प्रकट करण्यासाठी पुष्कळ रकाने खर्च केले आहेत. स्मिथ्सोनियन सारख्या मोठ्या संस्थेनेही २००२ साली “शेक्सिअरचा लेखक कोण?” हा मोठा परिसंवाद आयोजित केला होता. पण शेक्सपिअरविरुद्ध लिहिणाऱ्या, आपली मते हिरिरीने मांडणाऱ्या सर्वांचे पुरावे हे तकलादू, परस्परविरोधी आहेत.धूर्तपणणे लोकांच्या भावनेशी खेळण्याची ही एक विद्वत्तापूर्ण पद्धत आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे असा शेक्सपिअरच्या बाजूने बोलणाऱ्यांचा आरोप आहे.

Concordia Uni. आॅरेगन मधील प्रां.डॅनियल राईट हार्पर्स मॅगझिनमधील लेखात म्हणतात, “ शेक्सपिअर हा एक फारसा शिक्षित नव्हता, लोकर आणि धान्य्च दुकानदार आणि साहित्यिक जगताशीच नाही तर एखाद्या वाड•मय मंडळाशीही संबंधित नव्हता.”पण ही काल्पनिक विधाने आहेत” अशी ह्या आक्षेपांची बोळवण केली जाते. आणि ह्या प्रत्युत्तरात तथ्य आहे. शेक्सपिअर हा दुकानदार व्यापारी नव्हता. चांगल्या घरातला होता. वडिल नगरपरिषदेचे महापौर होते. त्याचे गाव लहान असेल पण महत्वाचे, लोकर व कातड्यांचा व्यापार व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे ते गाव होते. शिक्षण त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे पुरेसे आठ वर्षे घेतले होते. हां, महाविद्यालयीन कोणतेही शिक्षण नव्हते इतके मात्र म्हणता येईल.

History Today हे विद्वानांत व वाचकांतही मान्यता मिळालेले दर्जेदार पुस्तक आहे. त्यामध्ये लेखक विल्यम डी. रुबिन्स्टाईनने लिहिले आहे की,” त्यावेळच्या सर्वमान्य कागदपत्रांत शेक्सपिअरचे नाव आढळत नाही की तो एखाद्या पुस्तकाचा कर्ता, लेखक असाही कोठे उल्लेख दिसत नाही.” ह्या म्हणण्यात थोडेफार तथ्य आहे. पण त्याच्या साॅनेटची एक पुस्तिका प्रकाशित झाली होती. तसेच नाटकांच्या घाई गर्दीच्या त्याच्या काही नाटकांची quarter books प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली. त्यावर शेक्सपिअरचे कर्ता म्हणून नाव छापले होते; शेक्सपिअरचे समर्थक दाखवतात. पण त्याही पेक्षा एलिझाबेथ राणीच्या आणि किंग जेम्सच्या काळी राजवाड्यात शेक्सपिरची कंपनी आपली नाटके करत असे. जेम्सच्या काळी तर त्याच्या नाटकांचे राजांसाठी १८७ प्रयोग झाले होते. राजवाड्याच्या दप्तरांत ह्यांची नोंद होत असे. त्या अधिकृत नोंदणींच्या कागदपत्रात विशेषत: १६०४ आणि १६०५ साली शेक्सपिअरच्या नाटकाचीन नावे व लेखक विल्यम शेक्सपिअर असे उल्लेख स्पष्टआढळतात. हे असो, पण शेक्सपिअरचा विरोधी, लेखक, नाटककार ,राॅबर्ट ग्रीन त्याने आपल्या Groat’s-Worth of Wit ह्या पुस्तकातप्रथम शेक्सपिअरची केवळ एक नट पण नाटककार स्वत:ला नाटककार म्हणवून घेतो असा शेक्सपिअरला टोला मारला आहे ,पण नंतर त्याने तसे म्हटले ही माझी चूक होती असे म्हणत तो एक चांगला नाटककार आहे असेही म्हटले आहे. शेक्सपिअरचा तज्ञ, विद्वान जोनथन बेट काय म्हणतो तेही ध्यानात घ्यावे लागेल. तो म्हणतो, “शेक्सपिअरचा मृत्यु होऊन दोनशे वर्षे उलटून जाईपर्यंत शेक्सपिअर हा नाटककार लेखक नव्हता असे कोणीही म्हटले नाही की लिहिलेही नाही!”

शेक्सपिअर हा लेखक किंवा नाटककार नव्हता असे प्रथम १७८५ साली इंग्लंडमधील वाॅर्विकशायरच्या रेव्हरंड जेम्स विल्माॅटने मत मांडले होते. पण ते कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. सुमारे १८४५ते ५० ह्या दरम्यानच्या काळापासून अमेरिकेची डेलिया बेकन हिने शेक्सपिअर हा नाटककार नव्हता ह्यावर संशोधन चालू केले होते. शेक्सपिअर हा त्याच्या नाटकांचा लेखक नसून, खरा लेखक सर फ्रान्सिस बेकन आहे असे खळबळजनक विधान ठामपणे करणारी अमेरिकन बाई डेलिया बेकनला ते श्रेय जाते. तिच्या ह्या मताला राल्फ वुल्डो इमर्सन, वाॅल्ट व्हिटमन, एडगर अॅलन पो, नॅथनियल हाॅथर्न, मार्क ट्वेन, हेलन केलर ह्यासारख्या अमेरिकेतील नामवंत लेखक, कथालेखक,कवि, तत्वज्ञांचा पाठिंबा मिळत गेला. ती १८५३साली इंग्लंडमध्ये ह्यविषयावर संशोधन करायला गेली. जाताना इमर्सनने तिला इंग्लंड मधील लेखक तत्वज्ञ इतिहासकार थाॅमस कार्लाईलला तिची शिफारस करणारे आपले ओळखपत्र दिले होते. कार्लाईलने तिची राहण्याची वगैरे सोय करून दिली शिवाय इंग्लंडमधील विद्वानांची ओळख करून देतो अशीही तयारी दाखवली होती. तिने दोन वर्षे राहून फ्रान्सिस बेकनने ज्या ज्या ठिकाणी काळ व्यतित केला, तिथे जाऊन,राहून अभ्यास केला. पाचवर्षानंतर १८५७ साली ती अमेरिकेत परतली. त्याच वर्षी तिने आपला The philosophy of the Plays of Shakespeare Unfolded हा ६७५ पानांचा भलामोठा ग्रंथ प्रसिद्ध केले. वाचायला अत्यंत कंळवाणाआणि किचकट असे हे पुस्तक आहे. ह्या ६७५ पानात तिने एकदाही शेक्सपिअरच्या नाटकांच्या लेखका संबंधात फ्रान्सिस बेकनचा स्पष्ट उल्लेख केला नाही. पण वर उल्लेखिलेल्या नामवंतांचा तिला पाठिंबा मिळत गेला. पण वाचकांना संदर्भा संदर्भाने बेकन हा त्या नाटकांचा लेखक असावा असा निष्कर्ष काढता येतो.

खरा लेखक कोण किंवा कोणी तीनचारजणांनी मिळून लिहिले ह्या विषयी भाषाशास्त्राचे तज्ञ, भाषाशैलीचे विश्लेषक ह्यांचेही संशोधन चालू होते. ह्यांमध्ये आणखी तज्ञांची भर पडली म्हणजे गुप्त लिपी, भाषा वापरली आहे का ह्याचा अभ्यास सुरू झाला. युद्धात शत्रूचे गुप्तलिपीतील संदेश-पद्धती उघड करणारे तज्ञ असतात. तसे ह्या कामी तेही ह्यात उतरले. Ignatius Donnellyने जी पद्धत वापरून more low or shak’st-spur never writ a word (“शेक्सपिअरने हेलिहिले नसून मार्लोने लिहिला”) असे उघड केले त्याला, रेव्हरंड निकोल्सनने डाॅनेलीचीच पद्धत वापरून “master Will-I-am shak’st -spurr” (विल्यम शेक्सपिअरने लिहिले असे सिद्ध करून, प्रत्युत्तर दिले !

पण प्रसिद्ध तत्वज्ञ, राजकारणी,मुत्सद्दी शास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, सर फ्रान्सिस बेकनने ही नाटके लिहिली नाहीत त्यासाठीचा पुरावा म्हणजे बेकनला नाटके आणि तसले करमणुकीचे प्रकार अजिबात आवडत नव्हते. त्याने आपल्या अनेक निबंधात नाटके आणि तसले साहित्य म्हणजे बौद्धिक सवंगपणा व हीन अभिरुचीचे निदर्शक साहित्य प्रकार आहेत अशी खरमरीत टीका केली आहे !

१९१८ मध्ये गेटशेड (इंग्लंड) येथील शाळेतील शिक्षक जे. थाॅमस लूनीने पडद्याआडचा खरा शेक्सपिअर म्हणजे Earl of Oxford म्हणजेच Edward de Vere हा असल्याचे आपल्या Shakespeare Identified ह्या पुस्तकात मांडले. अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हा शेक्सपिअर असण्यासाठी योग्य उमेदवार होता. शिकलेला, हुषार, तसेच कवि आणि नाटककार म्हणूनही ओळखला जात असे. पण वस्तुस्थिती अशी आहे की शेक्सपिअरची कविता,नाटके म्हणून आजही जी ओळखली जातात त्याच्या पासंगालाही ह्या अर्ल आॅफ आॅक्सफर्डच्या कविता नाटके पुरणार नाहीत ! पण त्याची जमेची बाजू म्हणजे त्याने जग पुष्कळच पाहिले होते. खूप प्रवास केला होता. त्याला इटालियन चांगले येत होते. अर्ल असल्यामुळे दरबारी रीतिरिवाज, आणि राजकारणाची उत्तम माहिती होती. या शिवाय बराच काळ राणी एलिझाबेथच्या मर्जीतलाही होता.

अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हाच शेक्सपिअरचा खरा शेक्सपिअर असण्याबाबत आणखी एक महत्वाची बाब आहे. शेक्सपिअरच्या सर्व नाटकांतून धीरगंभीरपणा, खेळकर विनोद, सहृदयता, स्वभावातीस शांत आणि स्थिरपणा तसेच सामान्य व्यवहारी शहाणपण हे जाणवत असते. ह्या सर्व स्वभावविशेषांच्या विरुद्ध अर्ल आॅफ आॅक्सफर्ड होता ! तो उतावळा, शीघ्रकोपी, उद्दाम बेजबाबदार आणि हिंसा करायलाही मागेपुढे न पाहणारा होता. सतरा वर्षाचा असताना त्याने आपल्या घरगड्याला ठार मारले होते. पण अर्ल असल्यानुळे आणि राजदरबारात वजन असल्यामुळे तो सुटला. अशा स्वभावाचा असलेल्या अर्ल आॅफ आॅक्सफर्डने आपणच शेक्स्पिअरचे खरे लेखक आहोत ही बाब गुप्त का ठेवली ह्यावर मात्र जे.थाॅमस लूनीने कोणतेही कारण किंवा पुरावा दिला नाही.

वरील कारणांशिवाय आणखी एक बाब अर्ल आॅफ आॅक्सफर्डच्या विरुद्ध जाते. त्याच्याच आश्रयाखाली एक नाटक कंपनी होती. त्याच कंपनीला त्याने आपली नाटके का दिली नाहीत? ‘लाॅर्ड चेम्बरलेनस् मेन’ह्या शेक्सपिअर काम करत असलेल्या कंपनीला का द्यावीत? त्याचेही उत्तर लूनी आपल्या पुस्तकात देत नाही. (मला वाटते की त्याने आपल्याच कंपनीला त्याने ती दिली असती तर त्या नाटकात व्यक्त झालेली राजकीय बाजू ह्यानेच मांडली व हा त्या मतांचा पुरस्कार करतो हे राज्यकर्त्यांना लक्षात येणे सोपे गेले असते! शिवाय जर शेक्पसपिअरच्या नावाखाली त्याने ती लिहिली असतील तर शेक्सपिअरच्या कंपनीला ती प्रयोगासाठी देणे हे जास्त सयुक्तिक आहे.) ह्यापेक्षाही अर्ल आॅफ आॅक्सफर्ड हा शेक्सपिअर नाही ह्याचा पटण्यासारखा आणखी एक पुरावा म्हणजे हा अर्ल १६०४सालीच मरण पावला होता. आणि शेक्सपिअरची उदा.The Tempest , Macbeth इ. बरीच नाटके त्या नंतरची आहेत! ह्यावर आॅक्सफर्डवादी म्हणतात की ही नाटके त्याने आपल्या मृत्यु अगोदरच लिहून ठेवली असावीत. किंवा त्या पुस्तकांवर प्रयोगाच्या तारखा चुकीच्या असाव्यात. ही नाटके हा आॅक्सफर्डचा अर्ल मृत होण्यापूर्वीही झाली असण्याची शक्यता आहे. ह्या युक्तिवादात तथ्य आहे. कारण त्या काळी स्पर्धेमुळे प्रयोग लावण्याची जेव्हढी तातडी असे, तेव्हढीच घाई नव्यानेच व झपाट्याने पुढे येत असलेल्या छपाई व प्रकाशनाच्या व्यवसायाला quarter पुस्तके छापून ती लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची घाईसुद्धा तितकीच असे!

दोन्ही बाजूंचे म्हणणे काही असो, सर फ्रान्सिस बेकन हाच शेक्सपिअरचा खरा लेखक असावा ह्या मताला जसा थोरामोठ्यांचा पाठिंबा मिळाला तसे Earl of Oxford हाच शेक्सपिअरचा पडद्यामागील खरा लेखक होता असे म्हणणाऱ्यांत नोबेल पारितोषिक विजेता प्रख्यात कादंबरीकार व नाटककार गाॅल्सवर्दी, मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राॅईड, प्रख्यात अमेरिकन शेक्सपिरियन नट आॅर्सन वेल्स आणि डेरेक जेकब अशा थोरामोठ्या व्यक्तींनीही आॅक्सफर्डला शेक्सपिअर म्हणून उचलून धरले.

ह्या दोन मोठ्या व्यक्तींच्या पाठोपाठ ‘खरा शेक्सपिअर हाच’ म्हणून शेक्सपिअरचा समकालीन प्रसिद्ध नाटककार ख्रिस्टोफर मार्लोचे नाव पुढे येते.पण त्याच्या नावाला फार कुणाचा पाठिंबा मिळाला नाही.

त्यानंतर एक जबरदस्त आणि अनुरुप नाव समोर आले ते म्हणजे मेरी सिडनी, Countess of Pembroke,
हिचे. ही खरी शेक्सपिअर असली पाहिजे अशी चर्चा सुरु झाली. मेरी सिडनीवादी संशोधकांचा युक्तिवाद असा की शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह First Folio हा अर्ल आॅफ पेम्ब्राॅक आणि माॅन्टगोमरी ह्यांना अर्पण करण्यात आला आहे. हे दोघेही काउन्टेस मेरी सिडनीची मुले! ह्या काऊन्टेसचे घर जमीनजुमला मिळकत स्ट्रॅटफर्ड येथेच म्हणजे शेक्सपिअरच्या गावीच होती! वरील दोन गोष्टींमुळे ती शेक्सपिअर असण्याची दाट शक्यता आहे असे मानले जाते. तिची बाजू आणखी भक्कम करणारे मुद्देही लक्षात घ्यावे लागतील असेच आहेत. ती चांगली शिकलेली, विद्वान आणि सुंदर होती. तिचा भाऊसुद्धा कवि होता. तसेच तिचे काका राॅबर्ट डड्ले हेसुद्धा अर्ल होते. साहित्यिकांत तिच्या चांगल्या ओळखी होत्या.Edmund Spenser सारख्या कवीने आपली कविताही तिला अर्पण केली आहे. पण साहित्याची आवड असूनही तिचे स्वत:चे असे काहीही साहित्यिक लेखन नाही. त्यामुळेही तिचे नाव नंतर ह्या स्पर्धेतून मागे पडले.

एक मतप्रवाह असा आहे की शेक्सपिअर, कायदा, राजदरबार व राजकारण, न्यायालयीन कामकाज,वैद्यक आणि इतर अनेक लहान मोठ्या क्षेत्राचे इतके चौफेर ज्ञान असलेला एकच चतुरस्त्र माणुस असणे शक्य नाही. चार पाच प्रतिभावान, तज्ञ, जाणकारांनी मिळून ती नाटके लिहिली असण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यासाठी अनेक नावे समोर येतात. Countess of Pembroke उर्फ मेरी सिडनी, तिचा भाऊ सर फिलिप सिडनी, सर फ्रन्सिस बेकन, सर वाॅल्टर रॅले. पण ह्या मताला आणि नावांना पुष्टी देणारा पुरावा मिळत नाही. शिवाय इतक्या व्यक्ति ह्यामध्ये गोवल्या असतील तर ही माणसे इतकी वर्षे हे गुपित कसे राखू शकतील? अशक्य.

शेक्सपिअर हा नाटककार होता की नाही? शेक्सपिअरच्या नावाने ही नाटके लिहिणारा खरा लेखक कोण? ह्या प्रश्नाचे संशोधन करणारी व आपापले “खरा शेक्सपिअर “कोण हे सांगणाऱ्या पाच हजाराच्या वर पुस्तकातून सुमारे पन्नास नावे समोर येतात. त्या पुस्तकातील मते, प्रमेये, शंका, चर्चा यामध्ये एक ठळक व समान विचार असा की, शेक्सपिअरची शिक्षणासहित एकूण पार्श्वभूमी पाहिली आणि त्याची व्यक्ति म्हणून अशी फारशी माहितीही आढळत नाही, त्यावरून शेक्सपिअर येव्हढा बुद्धिमान व इतका प्रतिभशाली असणे शक्य नाही ! त्यामुळे ही उत्कृष्ठ नाटके त्याने लिहिलीच नसावीत. ह्या मतांतूनच किंवा शिक्षण, शहरे, खेडेगाव ह्या संबंधातील पूर्वग्रहातून त्याच्याविषयी हे संशयाचे मोहोळ उठले असावे.

शेक्सपिअर हा अशिक्षित, गावंढळ नव्हता. अगदी सामान्य घरातलाही नव्हता. त्याच्या वडलांचा व्यापार-व्यवसाय होता. आपला स्वभाव, व्यवहार कुशलता, बुद्धिचातुर्य, ह्यामुळे लोकांचा पाठिंबा असलेली ती व्यक्ति होती. गावचे ते नगराध्यक्ष होते. म्हणजे शेक्सपिअर गावात प्रतिष्ठा असलेल्या घरातील होता. आणि असा काही निसर्ग-नियम किंवा कोणी राज्यकर्त्याने कायद्याने बनवलेला नियम आहे की लेखक, साहित्यिक, व्यापारी, उद्योजक किंवा कलावंत होण्यासाठी उच्च शिक्षण आणि किंवा थोरा मोठ्यांचे घराणेच हवे ! पाश्चात्य देशातील आणि आपल्या महाराष्ट्रातीलही बऱ्याच प्रतिभावंत लेखक कवींची नावे वाचल्यावर कोणत्याही कलेसाठी आणि त्यात नामवंत प्रख्यात होण्यासाठी उच्चच काय फारसे शिक्षण हवे असे बंधन नाही.सर्जनशीलतेला अशा कोणत्ह्यायाही अटी लागू होत नाहीत!

सर्वकालीन श्रेष्ठ मानले जाणारे रशियन कादंबरीकार फ्योडोर दोस्ताव्हस्की, मॅक्झिम गाॅर्की कोणत्या काॅलेजात गेले होते.? गाॅर्कीला तर शाळा माहितही नव्हती. आजही त्यांच्या Crime and Punishment, Brothers Karamazov किंवाMy Childhood, My University Days, ही पुस्तके व Mother ह्या कादंबऱ्या वाचल्या जातात; अभ्यासल्या जातात. पोर्च्युगीज लेखक होझे सेरामागो( Saramago) ह्याला गरीबीमुळे मध्येच शाळा सोडावी लागली. तो यंत्र-दुरुस्तीचे काम शिकला. कामंही करु लागला. पण खरी आवड लिहिण्याची होती. लिहित राहिला. त्याच्या बऱ्याच कादंबऱ्यामुळे त्याचे परदेशातही नाव झाले; त्या वाचकप्रियही झाल्या, आणि १९९६ साली त्याला वाड.मयाचे नोबेल पारितोषिकही मिळाले! ह्या लेखकांसारखे आमचे श्रेष्ठ कवि, शाहिर, कादंबरीकार नारायण सुर्वे, शाहिर अण्णाभाऊ साठे ह्यांनी शाळेचा उंबरा पाहिला असेल नसेल पण तेही उघड्या जगाच्या बिनभिंतीच्या विद्यापीठातच शिकले. आधुनिक वाल्मिकी, प्रतिभावान कवि, चित्रपटकथा लेखक, श्रेष्ठ गीतकार, गदिमाआणि त्यांचे तितकेच उत्तम कथाकार, बनगरवाडी सारखी जागतिक दर्ज्याची कादंबरी लिहिणारे, माणदेशी माणसं सारखी अस्सल देशी लेणे ठरलेली,शब्दसामर्थ्याने सामान्यांना असामान्य बनवणारे भाऊ, व्यंकटेश माडगूळकर ह्यांनी हायस्कूल पाहिलेही नाही! लक्ष्मीबाई टिळक लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मुळाक्षरे लिहायला शिकल्या. त्यातूनच “स्मृतिचित्रे” सारखे आठवणीवजा अजरामर आत्मचरित्र निर्माण झाले. कितीजणांची नावे घ्यायची, आपल्या कडील किंवा परदेशातील प्रतिभावंतांची! उच्च शिक्षण नाही, खेडेगावातला म्हणून शेक्सपिअची नाटके त्याची नव्हेतच ह्या आक्षेपाला तसा काहीही अर्थ नाही.

शेक्सपिअरची बालपणापासून ते१८-२० वर्षे ज्या लहान गावात गेली ते अनुभव, ते दिवस, त्याच्या नाटकातही दिसतात. जोनाथन बेटने Cymbeline नाटकातील उदघृत कलेले शेक्सपिअरचे दोन ओळीचे काव्य पहा- “Golden lads and girls all must/ As chimney sweepers, come to dust ,” ह्या ओळींना आणखी वजन येते जेव्हा आपल्या लक्षात येते की वाॅर्विकशायरमध्ये सोळाव्या शतकात डॅंडलियनचे फुल येताना त्याला golden lad म्हणतआणि त्याच्या बिया इतस्तत: पसरणारा तो धुराडे स्वच्छ करणारा असतो. हे संदर्भ कोण वापरेल.? खेड्यात वाढलेला की राजवाड्यात, दरबारातच ज्याचा वावर असलेला? तसेच जेव्हा फाॅलस्टाफ ( सर जाॅन फाॅलस्टाफ ही व्यक्तिरेखा Henry IV part 1 आणि २मध्ये आहे.) आपल्याविषयी, as a boy I was small enough to creep into any alderman’s thumb ring” सांगतो तेव्हा हा अतिशयोक्त दृष्टान्त कुणाला सुचेल? एखाद्या सरदाराच्या मुलाला का ज्याचे वडीलच नगरपरिषदेचे (alderman) सभासद, उपमहापौर, महापौर होते त्या शेक्सपिअरला? शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्डमध्ये मेंढ्यांची लोकर व कातडे ह्यांचा बाजार भरत असे. त्या पासून निरनिराळ्या वस्तु बनविण्याचा उद्योगही तिथे चालत असे. त्यामुळे त्याला ह्या वस्तूंची, त्या कशा बनवतात त्याची स्वाभाविकच माहिती होती. त्याच्या नाटकात बरेच वेळा Skin greasy fells, ( मेंढ्याच्या लोकरी चा थर, त्या खालची कातडी, त्याचा अातील थर,) neat’s oil ( कातडे कमावण्यासाठी, मऊ पडावे ह्यासाठी चरबीपासून केलेले तेल; जुना मूळ अर्थ गाय, जनावरे) हे चर्मकाराच्या बोलण्यात येणारे शब्द येतात.आणि त्याला हेसुद्धा माहित होते की lute string(तंतू वाद्य व त्याच्या तारा) ह्या गाईच्या आतड्यांपासून करतात तर bow string घोड्याच्या केसाचे असतात! त्याचे वडीलही कातड्याचे हातमोजे पायमोजे वगैरे वस्तू तयार करण्यात वाकबगार होते. अशा तऱ्हेने त्याचे स्ट्रॅटफर्ड गाव ह्या ना त्या रुपात त्याच्या अनेक नाटकात डोकावत असते. सुखवस्तु शहरी पांढरपेशांना हे जमेल का? इथे आपल्याला व्यंकटेश, आणि गदिमा किंवा नारायण सुर्वे ह्यांच्या लिखाणाची आठवण येते.

सर्व रसिक वाचकांना, नाटकवेड्या प्रेक्षकांना, शेक्सपिअरच्या किंवा त्याच्या नाटकांच्या चाहत्यांना शेक्सपिअर कोण होता, तो खरा होता की दुसराच कोणी लेखक होता ह्यापेक्षा त्याच्या हॅम्लेट, रोमियो ज्युलिएट काॅमेडी आॅफ एरर्स, आॅथेल्लो अाणि इतर गाजलेली नाटके पाहण्यात, वाचण्यात, त्यातील खलनायक इयागो(Iago) जेव्हा माणसाचे गुण सद्गुणाविषयी बोलतो, A Virtue ! a fig ! ‘Tis in ourselves that we are thus or thus. Bodies are our gardens, to which our wills are gardeners…. If the balance of our lives had not one scale of reason to poise another of sensuality the blood and baseness of our natures would conduct us to most preposterous conclusions; but we have reason to cool our raging motions,..” अशी स्वगते ऐकताना ह्या खलनायकाच्या मतावरही विचार कराव लागतो ! शेक्सपिअरची आपल्याला देणगी असलेली ,“Some are born great,some achieve greatness, and some have greatness thrust upon them !” किंवा जगातल्या सर्व प्रेमिकांचा अनुभव सांगणारे सार , The course of true love never did run smooth !” अशा रुढ केलेल्या सुभाषितांसारख्या वाक्यांचा रसास्वाद घेण्यात खरा आनंद आहे. आणि त्याचा आनंद अक्षय टिकणारा आहे.

शेक्सपिअरसंबंधी झालेले इतके वाद प्रतिवाद वाचल्यावर आपण सामान्य वाचक आणि त्याचे चाहते त्याच्याप्रमाणेच अखेर “जग ही एक रंगभूमीच आहे. ज्याला जी भूमिका मिळाली त्याला ती करावी लागते” काही श्रेष्ठ नटांना कधी दुहेरी भूमिका करण्याचीही संधी मिळते तसे शेक्सपिअरचे झाले असावे, इतकेच म्हणू शकतो.

ज्युलियेट रोमियोविषयी म्हणते त्याप्रमाणे “ नावात काय आहे? गुलाबाला दुसऱ्या कोणत्याही नावाने ओळखले तरी त्याचा मधुर सुगंध तोच असतो!” तसा शेक्सपिअरही कोणत्याही नावाने ओळखला गेला तरी त्याच्या नाटकातील प्रतिभेचा विलास, भाषासौदर्य, त्याचे भाषा प्रभुत्व, प्रभावी संवाद, काव्य, विविध मानवी स्वभावाचे सत्य दर्शन यांचीच मोहिनी रसिकांवर निरंतर आणि चिरकाल राहिल!

शेक्सपिअर: व्यक्ति, कुटुंब आणि गाव

रेडवुड सिटी

शेक्सपिअर किती प्रख्यात आहे हे सांगायला नको. त्याची म्हटली जाणारी, तो शेक्सपिअर असावा अशी व त्याच्या चेहऱ्याशी काहीसे साम्य असलेली तीनच चित्रे उपलब्ध आहेत. आपण शेक्सपिअरचे फोटो, चित्र् पाहतो ती सर्व या तीन चित्रांवरून काढलेली असतात. त्या तीन चित्रांपैकी दोन चित्रे अगदी सामान्य चित्रकारांनी काढलेली आहेत. तिसरे चित्र व्यक्तिचित्र ( ‘पोर्ट्रेट’) म्हणता येईल असे आहे. पण तेही शेक्सपिअरचे नसून दुसऱ्या कोणाचे असावे असेही म्हटले जाते.

एका विरोधीभासाची गंमत बघा. शेक्सपिअरचे म्हणून स्ंगितलेले चित्र पाहिले की हा शेक्सपिअर म्हून ओळखतो. पण तो प्रत्यक्षात कसा दिसत होता हे आजही निश्चितपणे कुणालाही माहित नाही. मग शेक्सपिअर असा दिसत होता हे कसे समजायचे? तर त्यासाठी आपल्याला थोडाफार आधार मिळतो तो त्याच्या स्ट्रॅटफर्ड-अपाॅन-एव्हन Stratford -upon-Avon गावाच्या चर्चमधील त्याच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून ! हा पुतळाही काही विशेष शिल्पाकृति आहे असे नाही. पण त्याच्या गावातील शेक्सपिअरला प्रत्यक्ष ओळखणाऱ्या लोकांनी तो मान्य केला आहे. त्या पुतळ्यासारखा शेक्सपिअर दिसत होता इतके आपण समजून घ्यायचे.

शेक्सपिअरचे व्यक्तिविशेष कसे होते; त्याचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी, त्याची नेहमीची जाण्यायेण्याची ठिकाणे, त्याचे जवळचे मित्र कोण, बायकामुलांशी संबंध कसे होते, कुटंबातील वातावरण कसे होते,त्याचा पुस्तकांचा संग्रह असेल तर कोणती पुस्तके त्याच्या आवडीची, गप्पांचे विषय काय असायचे ह्याचीही माहिती कुठेही मिळत नाही. थोडक्यात त्याच्या खाजगी आयुष्याची माहिती उपलब्ध नाही!

आपली नाटके, सुनीते(sonnets), कविता यातून पन्नास लाख शब्दांचे अजरामर वाड़मय भांडार जगासाठी मागे ठेवून गेलेल्या स्वत: शेक्सपिअरच्या हस्ताक्षरातील मजकूर किती आढळतो? फक्त चौदा शब्दांचा ! शेक्सपिअरच्या हस्ताक्षरातील हे चौदा शब्द मिळतात तेही त्याच्या मृत्युपत्राच्या पानांवर वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या त्याच्या सह्यांच्या रुपाने ! ह्या सहा सह्या व by me हे दोन शब्द असे एकूण चौदा शब्द त्याने लिहिलेले आहेत. त्याने केलेल्या सहा सह्यांतील एकही सही दुसऱ्या सहीसारखी नाही.कोणतीही सही एकसारखी नाही. “Willm Shaksp.”, “ William Shakespe ,” “ Wm Shakpe,” “ William Shakspere ,” Willim Shakspere,” आणि “William Shakespeare ,” . आज रूढ असलेला त्याच्या नावाच्या स्पेलिंग मधील एकही सही नाही. पण समाजसंशोधक आणि भाषा संशोधकांच्या मते त्याकाळी स्पेलिंगच्या अचूकतेबद्दल आग्रह नव्हता. अनेक शब्द अनेक लोक निरनिराळ्या पद्धतीने लिहित असत. त्यावेळची कागदपत्रे, पुस्तकेही ह्याची साक्ष देतात.

शेक्सपिअरचा स्वभाव-आवडीनिवडी-मित्रमंडळी या वैयक्तिक बाबींविषयी काहीही माहिती मिळत नाही अशी खंत व्यक्त केली जाते असे म्हटले आहे. पण सोळाव्या- सतराव्या शतकातील अनेक मोठ्या लोकांविषयीही असेच घडल्याचे दिसते.

केवळ नाटककारांच्या बाबतीत म्हणायचे तर त्याकाळी शेक्सपिअरपेक्षा काकणभर जास्तच प्रसिद्ध असलेला थाॅमस डेकर हा आघाडीचा नाटककार, पण त्याच्याविषयीही तो लंडनमध्ये जन्मला; त्याने भरपूर लेखन केले; आयुष्यात बहुतेक कर्जातच बुडालेला असायचा इतकीच माहिती हाती लागते. तसाच बेन जाॅन्सन. हाही शेक्सपिअरपेक्षा प्रसिद्ध नाटककार. राजदरबारी मान्यता पावलेला. पण त्याचे जन्मसाल, जन्मठिकाण ह्याची माहिती कुठेही आढळत नाही. त्याचे आई वडील, त्याला किती मुलंबाळं होती ही माहिती आजही अज्ञातच आहे. त्यामानाने शेक्सपिअरविषयी थोडेफार का होईना तपशील उपलब्ध आहेत. पण तो थोर, जगप्रसिदध नाटककार, इंग्रजी भाषा समृद्ध करणारा साहित्यिक अशी कीर्ति कित्येक शतके गाजत असलेला आहे. हे विचारात घेतले तर त्यामानाने तो अज्ञातच आहे असे म्हणावे लागते.

शेक्सपिअरकालीन बऱ्याच प्रख्यात लोकांचे जन्मसाल , जन्मठिकाण यांच्या नोंदी आढळत नाहीत. तशीच लोकप्रिय नाटकांच्या लेखकांची नावेही कित्येक वर्षे गायब होती. लोकांना त्या नाटकांचे लेखक कोण त्याचा पत्ता नसे. त्या काळचे Arden of Faversham हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले हे माहित नाही. थाॅमस किडचे The Spanish Tragedy हेसुद्धा त्याकाळचे लोकप्रिय नाटक. पण त्या नाटकाचा लेखक किड (Kyd) आहे हे साहित्य, नाट्य ह्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या कोणत्या तरी कागदपत्रात दुसऱ्याच संदर्भात The Spanish Tragedyचा लेखक थाॅमस किड अशी नोंद आढळली. पण तो दस्तऐवजही पुन्हा दोनशे वर्षे सापडत नव्हता ! हे समजल्यावर शेक्सपिअरची त्याच्या नाटकांव्यतिरिक्त दुसरी काही थोडी तरी माहिती हाती लागते याचेच समाधान वाटते.

शेक्सपिअरचा जन्म २३एप्रिल १५६४ साली स्ट्रॅटफर्ड-अपाॅन – एव्हन या गावात झाला. ही नोंद त्या गावच्या नगरपालिकेच्या दप्तरात आढळत नाही. पण स्ट्रॅटफर्डच्या चर्चमध्ये विल्यम शेक्सपिअरचा बाप्तिस्मा २६ एप्रिल रोजी झाल्याची नोंद आहे. त्या काळी प्लेग देवी वगैरे रोगांच्या साथी सारख्या येत असत त्यामुळे बाप्तिस्मा विधी मूल जन्मल्यानंतर लगेच तीनदिवसांनी करीत. ह्यावरून शेक्सपिअरची २३ एप्रिल ही जन्मतारीख
मान्य झाली आहे.

शेक्सपिअर ज्या सालात जन्मला त्याच वर्षी प्लेगही आला. त्या भयंकर साथीत स्टॅटफर्डमध्येच दोनशे लोक मृत्युमुखी पडले. इंग्लंडमधील मुलांच्या एकूण संख्येपैकी दोन तृतियांश मुले मरण पावली. शेक्सपिअरच्या शेजाऱ्याचीच चार मुले प्लेगने वारली. एका अर्थी, शेक्सपिअरची थोरवी,पराक्रम, त्याने हॅम्लेट, आॅथेल्लो, मॅक्बेथ, किंग लिअर,अशी जगभर अाजही प्रयोग होणारी नाटके लिहिली ह्यात नसून, तो लहानगा विल्यम प्लेगच्या भयंकर संहारातही जिवंत राहिला ह्यात आहे. ही त्याची आपल्यासाठी मोठी कामगिरी !

शेक्सपिअरच्या वडिलांचे नाव जाॅन आणि आईचे नाव मेरी. जाॅन शेक्सपिअर गावातील एक प्रतिष्ठित होता. गावाच्या कारभारात-नगरपरिषदेत- तो सहभागी होता. नगरपरिषदेचील सभासदांचा पाठिंबा आणि गावच्या लोकांशीही चांगले संबंध ठेवून असल्यामुळे तो वजनमापे आणि किंमती यांचा तपासणी अधिकाऱ्याच्या पदापासून वर चढत नगराध्यक्षही झाला.

शेक्सपिअरची आई एका मोठ्या घराण्याच्या लांबच्या नात्यातली होती. शेक्सपिअरला तीन भाऊ व चार बहिणी होत्या. बहिणींपैकी एकटी जोन्स ही वयाच्या ७७व्या वर्षापर्यंत जगली. बाकीच्या तिघीजणी मात्र लवकर गेल्या. भावांपैकी फक्त विल्यम शेक्सपिअरच विवाहित होता. त्याच्या गिलबर्ट नावाच्या भावाचे शिवणकामास लागणाऱ्या वस्तूंचे दुकान होते. रिचर्ड हा चाळिशी गाठण्या आधीच गेला. सर्वांत धाकटा एडवर्ड. हा लंडनमध्येच नट म्हणून काम करत होता. तो नट म्हणून किती प्रसिद्ध होता का नाही किंवा तो कोणत्या नाटक मंडळीत होता ह्याची काहीच माहिती हाती लागत नाही. पण दु:खाची गोष्ट म्हणजे हा फार अकाली अगदी तरुणपणी वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी वारला!

शेक्सपिअरचे स्ट्रॅटफर्ड गाव त्याच्या आजूबाजूच्या अनेक गावांपेक्षा चांगले होते. चांगले म्हणायचे कारण ते गाव चांगली बाजारपेठ होती. आठवड्याचा बाजार तिथेच भरत असे. आजूबाजूच्या गावातील मेंढ्यांची लोकर व कातडे भरपूर येई. त्यामुळे स्ट्रॅटफर्डला लोकरीवर व मेंढ्यांच्या व इतर जनावरांच्याही कातड्यावर प्रक्रिया करण्याचा व त्यापासून अनेक वस्तु बनविण्याचा उद्योग होता. शेक्सपिअरच्या वडलांचाही तो चांगला व्यवसाय होता. ते कातडी हातमोजे बनवण्यात वाकबगार होते.ह्या मोठ्या उलाढलींमुळे स्ट्रॅटफर्ड गाव समृद्ध होते. विशेष म्हणजे तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा पगार इतर गावांतील शाळांच्या मुख्याध्यापकांपेक्षा खूपच जास्त होता.

शेक्सपिअरचे शिक्षण गावातील राजा सहावा एडवर्ड शाळेत झाले. त्यावेळच्या रीतीप्रमाणे विल्यम वयाच्या सातव्या आठव्या वर्षी शाळेत दाखल झाला. आणि रीतीप्रमाणे साधारणत: १५-१६ व्या वर्षापर्यंत त्याचे शिक्षण संपले.

शाळेत मुख्यत: अभिजात भाषाच म्हणजे ग्रीक आणि लॅटिन शिकवल्या जात होत्या.[ह्या काळात आपल्याकडेही संस्कृत पाठशाळाच असत.] “Thank you for your letter “ हे वाक्य लॅटिनमध्ये १५० निरविराळ्या पद्धतीने लिहायचे व म्हणायचे हाही एक अभ्यासाचा धडा असायचा. ह्याचेच आधुनिक काळात, एखादा शब्द लिहिण्यात किंवा पाढा चुकला तर तो शब्द, पाढा दहा वेळा लिहिण्याच्या शिक्षेत रुपांतर झालेलअसावे!

शेक्सपिअरची नाटककारात गणना होऊ लागली तेव्हा इतर साहित्यिकांनी, विद्वान किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांनी त्याच्या लॅटिनच्या ज्ञानाविषयी, लॅटिन येते का अशी शंका व्यक्त केली होती. वरील माहिती- जरी त्याचे शिक्षण केंब्रिज आॅक्सफर्ड सारख्या ठिकाणी झाले नसले तरी सर्वसाधारणपणे व्हावे तितके नक्कीच झाले होते, हे त्यांच्या टीकेला उत्तर आहे.

शेक्सपिअरचे लग्न अॅन हॅथवे हिच्याशी १५८२ साली झाले. ॲन शेक्सपिअरपेक्षा आठ वर्षांनी मोठी होती. तिचे माहेर शाॅटरी हे गाव स्ट्रॅटफर्डपासून खूपच जवळ म्हणजे एका मैलावरच होते. शेक्सपिअरला तीन मुले होती. थोरली मुलगी. तिचे नाव सुझॅनSusanna. ही १५८३ साली जन्मली. दोन वर्षांनी एक जुळे झाले. त्यातल्या मुलीचे नाव ज्युडिथ आणि मुलाचे नाव होते हॅम्नेट. दोन्ही मुली दीर्घायुषी होत्या. थोरली सुझॅना वयाच्या सहासष्ठाव्या वर्षी वारली. धाकट्या ज्युडिथला
सत्त्याहत्तर वर्षाचे दीर्घायुष्य लाभले. पण तिचा संसार मात्र सुखाचा झाला नाही. शेक्सपिअरला त्याच्या नाटकांमुळे मान प्रसिद्धी आणि पैसाही मिळाला होता. गावात त्याच्या कुटुंबाला प्रतिष्ठा होती.पण ज्युडिथने गावातल्याच अगदी सामान्य माणसाशी लग्न केले होते. सामान्य असणे हा काही कुणाचा अपराध नाही पण तो चारित्र्यानेही अति सामान्याहूनही खाली होता. त्याला बायकांच्या बाबतीतच एक दोन वेळा पोलिस कोठडीची काही काळ हवाही खावी लागली होती. थोरल्या सुझानला एलिझाबेथ नावाची मुलगी होती. ती १६७० साला पर्यंत हयात होती. हिची दोन लग्ने झाली. तिला मूलबाळ नव्हते. ज्युडिथला तीन मुले होती. त्यापैकी दोन मुली होत्या. व एका मुलाचे नाव तिने शेक्सपिअर ठेवले होते. दुर्दैवाने तिची ही तिन्ही मुलं ज्युडिथच्या अगोदरच वारली ! बरे तिघांनाही एकही अपत्य नव्हते. शेक्सपिअरचा एकुलता एक मुलगा हॅम्नेट बिचारा वयाच्या अकराव्या वर्षीच वारला.शेक्सपिअरच्या दोन्ही मुलींचीही मुले वारली. त्यांची मुलेबाळेही फार जगली नाहीत. त्यानुळे शेक्सपिअरच्या मागे त्याच्या वंशातला कोणीही राहिला नाही !

शेक्सपिअरची आर्थिक स्थिती चांगली होती. ह्याचे एक कारण तो व्यवहारी होता.खार्चिक नव्हता.त्याच्या लंडनमधील वास्तव्यात त्याची कीर्ती झाली होती. तो नाटककार कवि म्हणून ओळखला जात होता. त्याच बरोबर नट, नाटक कंपनीत भागीदारही होता. नाटकांच्या चलतीचा काळ होता. लोकांनी आपल्या नाटकांना गर्दी करावी म्हणून नाटक कंपन्या जवळ जवळ रोज नविन नाटके रंगभूमीवर आणायचे. त्यासाठी कंपनीजवळ नाटकेही भरपूर हवी असत. जरी कंपन्यांचे आपापले नाटककार ठरलेले असत तरी त्यासाठी दोन तीन नाटककार हाताशी हवे असत. शेक्सपिअरने बेन जाॅन्सन व इतर लेखकांच्या नाटकातही कामे केली ह्याचे कारण ती सहकाऱ्याची नाटके असत.

कंपनीत नट,नाटककार आणि भागीदार ह्या तिहेरी भूमिकेतून त्याची प्राप्ति चांगली होती. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात शेक्सपिअरची श्रीमंतात गणना व्हावी इतका तो सधन झाला. त्या काळात दर्जेदार नाटककाराला एका नाटकाचे दहा पौड मिळत.पण त्याच्या इतकाच यशस्वी असलेल्या जाॅन बेन्सनसारख्या लेखकाला आयुष्यभरात त्याच्या सर्व नाटकांचे मिळून फार तर दोनशे पौड मिळाले असतील. शेक्सपिअरच्या चढत्या कमानीच्या दिवसात त्याचे वार्षिक उत्पन्न दोनशे पौडांपासून सातशे पौड असावे असे संशोधकांचा अंदाज आहे.

येव्हढे चांगले उत्पन्न आणि त्यातच शेक्सपिअरचा खर्च करण्यात हात फार आखडता होता. चिक्कू म्हटले तरी चालण्यासारखे आहे. पण पैशाची गुंतवणुक करण्यात तो हुषार होता. त्यामुळे त्याने आपल्या गावात स्वत:चे मोठे घर घेतले. दर वर्षी चांगले उत्पन्न मिळवून देणारी एक शेतजमीनही घेतली. शिवाय घरासमोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक लहानसा मोकळा प्लाॅटही घेऊन ठेवला होता.

शेक्सपिअरने आपल्या मृत्युपत्रात एका बहिणीला, दोन्ही मुलींना, मित्रांना, रोख रकमा दिल्या व एका बहिणीला घर दिले. हे बहुतेक सर्व लोक करतात तसे शेक्सपिअरनेही केले. पण त्यातही त्याने आपला हात आखडता घेण्याचे वैशिष्ठ्य दाखवलेच आहे. इतक्या वर्षाचे आपले दोन सहकारी आणि मित्र जे त्याच्याच कंपनीत नट होते व शेक्सपिअरसारखेच भागीदारही होते त्यांना ह्याने फक्त दोन दोन पौड दिले!

आपल्या मुलींना त्याने १५०, १५० पौड ठेवले. आजच्या पौडाच्या किमतीने ही रक्कम नक्कीच मोठी आहे.पण त्या व्यतिरिक्त काही दिले नाही. आपली बहिण जोनला त्याने वडलोपार्जित घर दिले पण ती हयात असेपर्यंतच व नाममात्र भाड्याने ते दिले. पण आपल्या बायकोला शेक्सपिअरने काय दिले ह्याबद्दल त्याच्यावर टीका होते.
त्या काळच्या कायद्याप्रमाणे तिला इस्टेटीचा एक तृतियांश वाटा मिळणार होताच. पण शेक्सपिअरने स्वत:हून आपल्या इच्छेने आपल्या बायकोला आणखी काय दिले? तर”दुसरा उत्तम पलंग !” हे तिला देण्याची आठवणही शेक्सपिअरला मृत्युपत्राच्या अखेरी अखेरीस झाल्याचे दिसते !

ज्याने प्रेम, प्रेमकविता, प्रियकर प्रेयसी, पतिपत्नीच्या प्रेमासंबंधी भरभरून लिहिले, रोमिओ ज्युलियेट यांच्या अमर प्रेमकहाणीचे जगप्रसिद्ध नाटक लिहिले त्या जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअरला कायद्याने तिच्या हक्काचे जे मिळणार त्याव्यतिरिक्त आपणहून “ दुसऱ्या उत्तम पलंगा”शिवाय त्याच्या स्वत:च्या आवडीची किंवा तिला प्रिय असणारी एखादी वस्तु दागिना द्यावासा वाटला नाही? किंवा तिच्या मनातील आवडीच्या गोष्टीसाठी रोख रक्कम देऊ केली नाही? शेक्सपिअरच्या बऱ्याच तज्ञांनी ह्यासाठी शेक्सपिअरवर ठपका ठेवला आहे, त्यात काही वावगे नाही. पण दुसऱ्या काही संशोधकांना “दुसरा उत्तम पलंग” ही साधी किंवा हलक्या तऱ्हेची वस्तु वाटत नाही. सामाजिक पद्धतीप्रमाणे किंवा विचारसरणीनुसार ज्याला “Second Best Bed “ म्हटले जाते त्याला भावनिक महत्व आहे. रिवाज असा आहे की घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या खोलीतील पलंग हा सर्वात उत्तम असा असतो. ती खोलीही चांगल्या प्रतीच्या वस्तूंनी सजवली असते. स्वत:च्या खोलीतील पलंगही चांगलाच असतो. पण त्यात हलका,भारी, सुंदर ह्यापेक्षा लग्न झाल्यापासून तो पतिपत्नीचाच खास पलंग होतो. त्यावरच त्यांनी आपल्या संसाराच्या स्वप्नांचे, आयुष्याच्या सर्व सुख दु:खाचे,आनंदाचे,काळजीचे अशा सर्व भावनांचे दिवस अनुभवत संसार केला असतो. प्रपंचाच्या दिवसाची सुरवात आणि रात्रीच्या स्वप्नांचा प्रारंभ तिथेच झालेला असतो. त्यामुळे शेक्सपिअरने तसे मृत्युपत्रात व्यक्त केले त्यात गैर नाही. त्याने बायकोला दुर्लक्षित केले असे नाही, असे त्याची बाजू घेणाऱ्यांचे मत आहे. पण शेक्सपिअरवर ह्याबद्दल टीका करणाऱ्यांना ह्या युक्तिवादात तथ्य वाटत नाही. इतर अनेकजण असे करतात पण त्याचबरोबर बायकोला म्हणून आणखी काही विशेषही ठेवतात. भले ते नाटककार,कवि नसतीलही. शेक्सपिअरच्या मृत्युपत्रातील हे कलम चर्चेचे झाले होते म्हणून इतक्या विस्ताराने त्यावर लिहिले.

ह्यामागे खरे महत्वाचे कारण म्हणजे विल्यम शेक्सपिअर व्यक्ति,त्याचे त्याच्या बायकोशी संबंध कसे होते,तो माणूस म्हणून कसा होता ह्यावर प्रकाश टाकणारे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शेक्सपिअरवर चारशे वर्षे अभ्यास चालू आहे. आजही त्याची नाटके इतर वाड•मय व व्यक्ति शेक्सपिअर ह्यावर संशोधन विचार विमर्ष होतच आहे. इतक्या वर्षांच्या ह्या काळात शेक्सपिअरचा उल्लेख असलेली शंभर एक कागदपत्रे मिळतात. पण ती बहुतेक सरकारी कचेऱ्यातील नोंदी, शेक्सपिअरवर कर भरणा केला नाही त्याच्या नोटीसा, खरेदी-विक्रीच्या व्यवहारिक नोंदी, कर भरल्याच्या पावत्या हीच जास्त आहेत. ह्यावरून शेक्सपिअरचे व्यवहार समजतील पण तो नवरा, वडील, मित्र, शेजारी म्हणून कसा होता, त्याच्या आठवणी अशी काहीही माहिती आजही कुठे मिळत नाही. त्याच्या नाटकातील काही संवाद, प्रसंग ह्यावरून त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यातूनही आपल्याला शेक्सपिअरची माणूस ही ओळख होत नाही.नाही म्हणायला त्याचा अवघ्या अकरा वर्षाचा मुलगा हॅम्नेट गेल्याचे दु:ख, त्या दु:खाचे हुंदके त्याने त्याच वर्षी लिहिलेल्या King John नाटकातील आईच्या हृदयस्पर्शी, काव्यमय स्वगतातून उमटलेले जाणवतात. नाटकातली आई काॅन्स्टन्स आपल्या मेलेल्या राजपुत्राच्या दु:खाने व्याकुळ होऊन खोलीतल्या प्रत्येक
वस्तूतून तो तिला डोळ्यांसमोर दिसतो ते करुणरम्य स्वगत वाचण्या-ऐकण्यासारखे आहे:ते वाचताना कवि गोविंदाग्रजांची (राम गणेश गडकरी) अतिशय शोकविव्हळ करणारी राजहंस माझा निजला ह्या कवितेची, तिच्यातील आईच्या दु:खाची आठवण येईल.
त्या स्वगतातील काही भाग उदघृत करतो:-

Grief fills the room of my absent child,
Lies in his bed, walks up and down with me,
Puts on his pretty looks, repeats his words,
Remembers me of all his gracious parts,
Stuffs out his vacant garments with his form…..

शेक्सपिअरच्या कंपनीतले त्याचे दोन सह भागीदार व सहकारी नट आणि मित्र जाॅन हेमिंग्स ( John Hemminges )आणि हेनरी काॅन्डेल यांनी शेक्सपिअरच्या मृत्युनंतर त्याच्या अठरा नाटकांचा एक संग्रह प्रसिद्ध केला. त्या दोघांच्या चिकाटी आणि मेहनतीमुळे आपल्याला शेक्सपिअरची नाटके छापील स्वरुपात पाहायला मिळतात. हे दोघेही शेक्सपिअरच्या अखेरपर्यंत त्याच्या कंपनीत होते. त्यामुळे प्रयोगासाठी केलेली टिपणे, शेक्सपिअरच्या नाटकांची हस्तलिखिते, प्राॅम्पटरच्या (पार्श्वपाठक) वह्या, नटांना दिलेले त्यांचे संवाद, व ह्यापूर्वी त्याच्या नाटकांची छापलेली पण भरमसाठ चुका असलेली पुस्तके, त्या प्रति शुद्ध करून दोघांनी केलेल्या छपाईला द्यायच्या प्रति असे अनेक सोपस्कार पार पाडून त्या दोघांनी शेक्सपिअरच्या नाटकांचा संग्रह First Folio ह्या नावाने ओळखला जाणारा संग्रह प्रसिद्ध केला. या संग्रहाचे चांगले स्वागत झाले असावे. बऱ्याच वर्षानंतर का होईना त्या संग्रहाची दुसरी आवृत्ती १६३२ साली प्रसिद्ध झाली. पण तिसरी आणि चवथी आवृत्ती प्रकाशित व्हायला १६६३ व १६८५ साल उजडावे लागले!
पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या दोघांनी जमवलेल्या वर लिहिलेल्या शेकस्पिअरच्या हस्ताक्षरातील सर्व लिखाण आणि इतर सामग्रीही ह्यापैकी आज काहीही उपलब्ध नाही. तसेच आतापर्यंत सांगितलेल्या शेक्सपिअरच्या सहा सह्याशिवाय त्याच्या हस्ताक्षरातील काहीही उपलब्ध नाही.तसेच त्याच्या वाचनात असलेली लंडन व स्ट्रॅटफर्डच्या घरातली पुस्तके, त्यांनी नाटकाचे लिहिलेले कच्चे आराखडे,टिपणे इतर कविता वगैरे लिखाण, पत्रव्यवहार, किंवा त्याच्या मालमत्तेची सविस्तर यादी, अशी ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे साहित्य जतन करण्यासाठी त्याच्या मृत्युनंतर लंडनला पाठवले असणार. पण १६६६ सालच्या लंडनमधील प्रचंड आगीच्या तांडवात ती सर्व जळून खाक झाली असावीत असे म्हटले जाते.

त्याच्या गावातील पुतळा आणि त्याची म्हणून ओळखली जाणारी तीन चित्रे ह्यावरून शेक्सपिअर ह्या जगप्रसिद्ध आणि प्रतिभाशाली नाटककाराची माहिती होते. आजही त्याच्या नाटकांच्या होणाऱ्या प्रयोगामुळे सर्व जग शेक्सपिअरला ओळखते. सर्व जग शेक्सपिअरला ओळखते पण माणूस शेक्सपिअर कसा होता हे कुणालाच माहित नाही. शेक्सपिअर तसा अज्ञातच आहे !

सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची. आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.
फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घ्यायची. हापिंग करत चार चाकं पुढे गेल्यावर समजायचे की अरे मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो.

सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊन आलो होतो. टाॅलस्टाॅयच्या निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता.बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद व्हायचे. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.
त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. आता गोन्यल कडून घ्यायची.

सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर,” हरकत नाही म्हणाले;पुढे बघू “.

सायकल दुरुस्तीचीही अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा एक कार्यक्रमच असायचा आमच्यासाठी. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत, टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी तिचा प्रत्येक भाग दाबत दाबत पाहत जायची.

आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!
आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर तो निराशेने पाणी झटकायचा. आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा.

ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा.पाहातच राहत असू आम्ही. तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा.

वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितलेले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरती झलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड!

पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच,असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते.

दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा. साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे.

आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित,सालंकृत सायकल पहायला मिळण्यासाठी सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच !

माझा मित्र बंडूने चौडेअण्णांच्या दुकानातून नवी कोरी सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा एव्हढा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herstz होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच मडगार्ड आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

सायकलचे दिवस

Redwood City

सॅनफ्रान्सिस्को,रेडवुड सिटीमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अर्धा दिवस अथवा काही तास सायकल वापरायची.

आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय.

फॅशनच्या बाबतीत -कपड्याची किंवा दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या काॅलरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा काॅलेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही ही योजना होती.त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा ‘किती कल्पक असतात लोक ‘असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ‘ भाड्याच्या सायकली मिळण्याचे दुकान’ म्हणत. दुकानदार,”चौंडे सायकल मार्ट’ किंवा ” गोन्यल बंधू सायकल मार्ट” नाव लावून धंदा करत. चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास किंवा स्पर्धेत एक आणा तास असे. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे ऱ्भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! असत्या तर रामराज्याची कुणाला आठवण तरी झाली असती का? आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. ” पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!” त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो धैर्यधर थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना “मी तर ३:५०लाच सायकल आणली” असे पुटपुटलो तर “घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! “नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे.” मालक म्हणणार, “अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की.” चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या स्वस्तिक किंवा साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून,” किती वाजले?” विचारून घेतले. हापिंग करत चार चाकं पुढे गेलो तर मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. ” पंम्च्यर केला काय तू, आं?” दोन नोकरांकडे बघून मालक तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार “अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!” दुसरा नोकर लगेच ,” आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!” मी गोरामोरा होऊन,”अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे! मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो. सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला,” मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. “चार आणे झाले.” मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊनआलो होतो. टाॅलस्टाॅयच्या,निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टातक आलो होतो. मालकाला म्हणालो,” मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही.” ” नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून.”मालक तिरके बोलत होता. बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद झाले. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?” हे ऐकून घरी यावे लागे.

त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. गोन्यल कडून घेतली. सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो. आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. “अर्धा तास, अर्धा तास” स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय जमते. पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा प्रयत्नांती परमेश्वर म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले. माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही.” चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालवतो म्हणे.” असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्यावर,एका खोक्यावर पंक्चरवरील औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी असलेला साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले. पंक्चर नाही ? पंक्चर नाही? ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, “ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय.” त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, “थोडं थांब.” त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर हरकत नाही म्हणाले.पुढे बघू .

सायकल दुरुस्तीची अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तर लहानसहान दुरुस्त्या पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुलेही बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे ” पंम्चर काढून मिळेल” ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा आम्हाला एक कार्यक्रमच असायचा. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डाॅक्टर इतक्याच काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत फिरवल्यासारऱ्खी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी भागश: दाबत दाबत पाहत जायची. आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यात दिसणाऱ्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!

आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर निराशेने पाणी झटकायचा, आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा. ही कलाकारी पाहण्यासारखी असते. काही पंक्चरवाले- सर्जन चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा. ममपाहातच राहत असू आम्ही.

तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते. बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने त्या रबराच्या त्वचेला लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा. वईसाचे ते हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरतीझलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडा जाड! पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, पदट्ट्यावर रेलून, तो वरचे हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देणार; ज्यालिंदर असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी “लै पावरफुल्ल” म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे ऱ्थोटूक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. “आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय” इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र,” अब्ये कुणाला ववाळाला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवूनआं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा.” म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल काॅलेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा. सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती ‘जीवाची सखी’च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. पण किती! चाकातली प्रत्येक तार चमचम करीपर्यंत. डोळे दिपून अपघात व्हायचे! इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टाॅवेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या. “पायडल, हॅंडवेल सीट बिरेक” येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हेच शब्द वापरणारे सायकल चालवण्यात तरबेज होते. दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून ‘हॅंडवेलवर’ पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू. फार हुषार असेल तर सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून कुणी तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. पण सीटला ‘सॅडल’ किंवा मध्येच ‘हब’ वापरून इंप्रेशन मारणारेही असत! बरे दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा.

साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे. आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरूनआणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्डआणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित, सालंकृत सायकल पहायला मिळायला सुद्धा कुंडलीत योग लागत. दैवयोगाने आम्हाला शाळेत व काॅलेजात मोजून तशा दोन तीन दिसायच्या. बाकी बहुसंख्य सायकली चारचौघी सारख्याच; घंटी सोडून सगळे पार्टस् वाजणाऱ्याच!

माझा मित्र बंडूने नवीन सायकल घेतली. तेव्हा त्याचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वर आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची महिरपी सारखी नक्षी व्हायची. रुबाबदार दिसायचा! सर्व मुले,सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन म्हणून आणि सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा;त्यामुळे दोघांकडेही टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला ‘एक चक्कर मारु दे रे’ म्हणत विनवणी करायचे. बंडूने सगळ्यांना ती फिरवायला दिलीही. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले. नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, “हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?” त्या सज्जन भावांनी, ” नाही; पण आणणार आहोत आम्ही,” असे सांगितले. महिना दीड महिना उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा चांगुलपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herst होते. बामणोद ची सायकल भालोदला देता येत होती! चार पाच मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच आवाज करायचे. तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने आहेत.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, Share the bike चे मूळ रूप “सायकली भाड्याने मिळतील” ही दुकाने केव्हढी सोय होती!

 

शेक्सपिअर आणि लंडन

रेडवुड सिटी

शेक्सपिअरचाच काळ म्हटले तर सोळाव्या शतकाच्या मध्यापासून ते सतराव्या शतकाचे दुसरे शतक असे म्हणता येते. त्या अगोदरच्या शतकापासून इंग्लंड,  

रोगराई, अनेक प्रकारचे आजार, देवी,प्लेग आणि साथीच्या रोगांसारख्या अनेक संकटांनी त्रस्त आणि  ग्रस्त झाले होते. खुद्द इंग्लंडच्या राणीला, शेक्सपिअर जन्मायच्या आधी दोनच वर्षे, देवी आल्या होत्या.आणि शेक्सपिअरच्या जन्मावेळीही ह्या साथींची लागण होतीच.त्यातच लंडनमध्ये बरेच वेळा प्रचंड आगींचेही मधून मधून थैमान चालू असे.ह्याचा परिणाम असा की जन्म नोंदींपेक्षा मृत्युच्या नोंदीच जास्त होत्या ! 

काही रोग त्या काळीच असतात तसेच विशिष्ट प्रदेशापुरतेच मर्यादित असतात. त्या आजारांचे निदानही होऊ शकत नाही. तसाच एक आजार म्हणजे English Sweat !  हा कसलीही  पुर्वचिन्हे न दाखवता तात्काळ यायचा आणि मृत्युही तडकाफडकी यायचा! ह्या आजाराने कित्येक हजार लोक गेले असतील! नशीब असे की त्यानंतर हा आजार पुन्हा कधीही आला नाही. तसाच दुसरा आजार, त्याचेही निदानच करता येत नसे. म्हणून त्याचे नाव ‘नविन आजार ‘. ह्या आजाराने १५५६ ते १५५९ या चार पाच वर्षांत कितीतरी हजारो लोकांचे बळी घेतले असतील! ह्या आजाराचेही संकट पुन्हा आले नाही. पण प्लेग मात्र वारंवार तोंड वर काढत होता. शेक्सपिअरच्या जन्मानंतर तीनच महिन्यांनी त्याच्या गावी साथ आली होती.गावातील दोनशे लोकांचा बळी घेतला. त्या साथीत शेक्सपिअरच्या स्ट्रॅटफर्ड-अपाॅन – एव्हन मधीलच नाही तर जवळपास लंडन व इतरत्र लहान मुलांच्या लोकसंख्येपैकी दोन तृतियांश बालकांचा मृत्यु झाला! 

लंडन हे तर ह्या सर्व गोष्टींचे केंद्र होते म्हणायला हरकत नाही. हे आजार आणि साथी तर होतच पण बंदर असल्यामुळे खलाशी कुठून कुठून येत. ते आपल्याबरोबर गुप्तरोगासह इतरही रोग आणीत व ते लंडनमध्ये पसरत. लंडनमध्ये प्रचंड आगीही लागत.तरीही इ.स.पंधराशे साली लंडनची असलेली पन्नास हजार लोकसंख्या वाढत वाढत सोळाशी साली ती चौपट म्हणजे सुमारे दोन लाख झाली होती. ह्याचे कारण म्हणजे लंडनच्या आजूबाजूच्या परगण्यांतून पोटापाण्याच्या शोधात लोकांचे लोंढे येत. महाराष्ट्राला तर हा अनुभव आजही भोगायला मिळतो.तसेच इंग्लंड प्राॅटेस्टंट असल्यामुळे युरोपमधील इतर देशात ज्यांचा धार्मिक छळ होत असे तेही लोक लंडनमध्येच धडकत. हे सर्व कमी की काय म्हणून त्यात दुष्काळ पडे. १५५५ आणि १५५६ ही दोन वर्षे सतत दुष्काळाची गेली. बेकारी दारिद्रय ह्यात वाढ झाली. 

अशी परिस्थिती असतानाही लंडनमधील नाट्यगृहे व इतर करमणुकीचे खेळ करणारी थेटरे मात्र रिकामी नसत ! लोक परिस्थितीला तोंड देत पुढे जात असतात. काळ आपल्याला अनुकुल करून घेण्याची माणसाची धडपड असते. आणि करमणुक करून घेणे, मनोरंजनाची साधने शोधणे ह्यामध्ये माणूस कोणत्याही काळात कल्पकच राहिला आहे. नाटक हे करमणुकीचे प्रमुख आकर्षण व नाट्यगृहे केंद्रस्थानी होती. 

लंडन तर मोठे शहर. टाॅवर आॅफ लंडन आणि सेंट पाॅलचे कॅथेड्रलच्या भोवतालून जाणारी मोठी तटबंदी लंडनभोवती होती. त्या तटबंदीच्या आतील ४४८ एकरावर लंडन वसले होते. शेक्सपिअरच्या वेळचे लंडन तसे लहानच म्हणायचे. दक्षिणोत्तर दोन मैल आणि पूर्वं-पश्चिम अंतर तीन मैल! तरीही संपूर्ण युरोपमध्ये त्यावेळी नेपल्स आणि पॅरिस ही दोनच शहरे लंडनपेक्षा मोठी होती. लंडनच्या भोवती असणाऱ्या तटबंदीचे काही अवशेष आजही दिसतात.आपल्याकडे औरंगाबाद मधील पैठण गेट,भडकल गेट किंवा सोलापूरातील बाळी वेस,विजापूर वेस या वेशींच्या नावांवरून गावाच्या जुन्या सरहद्दी समजतात तशा लंडनच्या तटबंदीची आठवण बिशप गेट, न्यू गेट अशा वेशींच्या रूपाने आजही जपलीआहे.

वारंवार येणाऱ्या प्लेगच्या व इतर अनेक रोगांच्या साथीमुळे,सरदार,दरकदार,अमीर उमरावांनी आपले महाल, वाडे लंडन बाहेर बांधले होते. राजवाडा आणि ह्या सर्व इमारती रिचमंड,ग्रीनविच,हॅ्म्टन कोर्ट ह्या गावात होती.

वारंवार उदभवणाऱ्या साथीचे रोग,प्लेग, दुष्काळ, मोठ्या शहरात पोट भरण्यासाठी करावी लागणारी कमालीची धडपड ह्या परिस्थितीमुळे लोकांची आयुर्मर्यादा ३५ वर्षेच होती. गरीबांच्या वस्तीत तर ती उणीपुरी फक्त पंचवीस वर्षे इतकीच होती! 

लंडनमधील अरुंद रस्त्यांची आणि गल्ली बोळांची आज कल्पनाही करता येणार नाही. काही मोजके मुख्य रस्ते सोडले तर सर्व रस्ते फारच अरुंद होते.घरेही एकमेकांना चिकटलेली. त्यांची छपरेही एकमेकांच्या घरांना चिकटलेली असत! घाटाचा रस्ता किती बाकदार वळणा वळणांचा होता ह्या अतिशयोक्तीच्या गोष्टीतील, तिथून जाणाऱ्या आगगाडीचा इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड एकमेकांशी हस्तांदोलन करीत,तसे अशा इमारतींच्या वरच्या मजल्यावर राहणारे बोलता बोलता दुसऱ्यांच्या घरात जात! 

कचरा सांडपाण्याची विल्हेवाट लावणे जिकीरीचे होते. लंडनचा आढावा घेणारा,लंडन शहराचा इतिहासकार जाॅन स्टो म्हणतो,” मेलेली कितीतरी कुत्री- मांजरे त्या खड्डयात टाकलेली असत. त्यावरूनच त्या खड्यांचे नाव HoundsDitches पडले. 

अशा घरांच्या वस्तीतच श्रीमंत आणि गरीबही शेजारी राहात असत. लंडन ब्रिज जवळच्या डाॅऊगेटच्या भिकार वस्तीतील आपल्या घरात राहणारा कादंबरीकार विद्वान राॅबर्ट ग्रीनची अखेर झाली. राॅबर्ट ग्रीनचे हे घर, इंग्लंडचा त्यावेळचा प्रसिद्ध दर्यावर्दी, धनाढ्य फ्रान्सिस ड्रेकच्या घरापासून चार घरे सोडूनच होते! अशीही वेगळी समानता त्यावेळी होती ! 

रायगडाचे सर्व दरवाजे रात्री नऊच्या तोफेला बंद होत. त्याप्रमाणे लंडनच्या सर्व वेशींचे दरवाजे संध्याकाळी सात वाजता बंद होत. कोणालाही तटबंदी बाहेरून आत येण्यास आणि बाहेर पडण्यास बंदी होती. पण कायदा तिथे पळवाट आणि जिथे अंमलबजावणी तिथे ढिलाई येतेच. 

तटबंदीच्या बाहेरच नाट्यगृहे. आणि इतर करमणुकीच्या खेळांची व कार्यक्रमाची थेटरे होती. ते सर्व खेळ सात आणि त्यानंतरही बऱ्याच वेळाने सुटत. त्या प्रेक्षकांना अडवले जात नसावे. तटबंदीच्या आतील,गावातील सर्व हाॅटेले खाणावळी दारुचे गुत्ते सात वाजताच बंद करावे लागत. पण इथेही कायदा काटेकोरपणे पाळला जात नसावा किंवा पोलिसांना लोक जुमानत नसावेत. कारण नाटकात आणि इतर खेळातही रात्री बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची टर उडवलेली असे. शेक्सपिअरनेही आपल्या Much Ado About Nothing  मध्ये डाॅगबेरी ह्या पात्रातून पोलिसांची चेष्टाच केली आहे. 

लंडनच्या प्रशस्त चौकात बारा एकरात उभे असलेल्या सेंट पाॅल चर्चची अवस्था अस्ताव्यस्त म्हणावी की अत्यवस्थ असा प्रश्न पडतो. काही वेळेला वाटते की हे चर्च वगैरे नसून सगळा ‘ या या घर आपलेच आहे, ऱ्निवांत हात पाय पसरा, पसार व्हा,पंगती उठवा,पतंगी उडवा काहीही करा’ अशी त्यावेळी तिथे रोज स्थिती होती.

तिथे काय नव्हते? स्मशानही होते आणि बाजारही भरलेला असे.ह्यापूर्वीच्या शतकात छापील पुस्तके घेणे ही चैनीची,श्रीमंतांची बाब होती. पण छपाई यंत्रे वाढली, कागदही भरपूर मिळू लागला. त्यामुळे पुस्तकेही भराभर बाहेर येऊ लागली. बऱ्यापैकी माणूसही पुस्तके घेऊ शकत होता. त्यामुळे बाजारात पुस्तकांची,कागद आणि इतर स्टेशनरीचे दुकानदार दुकाने मांडत असत. एलिझाबेथ राणीच्या काळात सात हजाराहून पुस्तके प्रकाशित झाली होती! ह्या कॅथड्रेलच्या आतली परिस्थितीही फारशी निराळी नव्हती. त्याच्या आतल्या विशाल भागात तर अतिशय गोंधळ, गडबड, गजबजाट आणि निरनिराळे आवाजच आवाजांचे राज्य होते. आतही बाजार भरलेला! सुताराची लाकडी वस्तूंची, लोकांना पत्रे, सरकारी कागदपत्रे, अनेक प्रकारचे अर्ज लिहून देणाऱ्या ‘ लेखनिकांच्या’ टपऱ्या, वकीलांचे लहान दुकानांसारखी कार्यालये, आणि इतर कारागिर, कामगारांच्या टपऱ्या, मालाची नेआण करणारे. तसेच इतर निरनिराळे व्यवसाय करणारेही  बसलेले असत. त्यातच दारुडे, रिकामटेकडे इथे तिथे पसरलेले असत! काहीजणांनी तर तिथेच,जिथे तिथे लघवी केंद्र म्हणूनही कॅथेड्रलचा वापर केला असे!   

चर्चच्या मार्गिकेमध्ये अनेक लहान मुले चेंडू, चेंडूफळीचे खेळ खेळत असत. चर्चच्या लोकांना त्या मुलांना हुसकावून लावणे हेच काम आहे असे  वाटावे इतपत पोरे गर्दी करत.त्यातच आवारात अनेक लोक शेकोट्या पेटवून स्वत:ला उबदार ठेवण्याचा उद्योग करत. जिकडे तिकडे धूरच धुर! चर्चच्या आतही हा धूर पसरलेला असे! ह्या सगळ्या गलक्यात पाद्र्याचे प्रवचन चालू असे. चर्चमधल्या भक्तांना काय ऐकू येत असेल ते तेच जाणोत.एक पिढी उलटून गेल्यावर सेंट पाॅलच्या कॅथड्रेल मध्ये आलेला जाॅन एव्हलिन लिहितो,” मी त्या भव्य आणि प्रशस्त चर्चमध्ये जायचो तेव्हा तिथे पसरलेल्या धुरामुळे फादर दिसतही नसे आणि तेथील प्रचंड कोलाहलामुळे तो काय उपदेश करतोय तेही ऐकू येत नसे!” 

ह्या चर्चचा आणखी एक व्यवहारी उपयोग लंडनचे लोक करीत. ते चर्च अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग होता की नाही हे सांगता येणार नाही. पण पलिकडे असलेल्या रस्त्यावर जायला लोक ‘ जवळचा मार्ग’ short cut म्हणून रोजच सर्रास वापर करीत! त्याला एक कारण म्हणजे लंडनला केव्हाही पडणारा पाऊस. पाऊस पडायला लागला की आडोशासाठी येणारी रहदारी तशीच चर्चमधून थेट पलीकडच्या रस्त्यावर जात असे. लोक पाऊस पडू लागला की कोणत्याही बंदिस्त जागेत आडोसा गाठण्यासाठी धावत पळत निघत. ह्या तारांबळ उडवणाऱ्या घाई गर्दीमागे लंडनचे पावसाळी हवामान आणि दुसरे नुकतीच फ्रान्समधून आलेली काॅलरची फॅशन! ही काॅलर मानेभोवती असणे हे केवळ फॅशनचेच नव्हे तर प्रतिष्ठेचे लक्षण होऊ लागले होते. काॅलर तरी कशी? कापडी फितींच्या(laces)फुलांच्या मोठ्या पाकळ्यांचे आकर्षक पद्धतीने लावलेले थर.माणसाकडे पाहिले तर जणू मोठ्या फुलातून डोके उमलले आहे असे वाटावे.ही काॅलर लेसची आणि खळ लावलेलीअसे. पावसात भिजली की कोमेजून जायची. पाकळ्या पंख मिटून पसरून पडायच्या. त्यामुळे ती वापरणाऱ्याचाही रुबाब कमी होऊन त्याचाही चेहरा मलूल होऊन जायचा ! शिवाय त्या काळी कपड्यांचे रंगही कच्चे होते. बहुतेक रंग पाण्याने ओघळायचे. सर्व कपड्यांवर ते पसरायचे. ही दुसरी भीती! त्यामुळे पाऊस पडू लागला की सगळीकडे आपली शान जाऊ नये म्हणून एकच धावपळ आणि गडबड उडायची. मग ‘सेंट पाॅल’ शिवाय कोण आश्रय देणार? 

ह्या फॅशनेबल काॅलरचे नाव समजल्यावर मला पुलंच्या ‘ अपूर्वाई’ मधला संवाद आठवला! पुलंना पिकॅडलीला जायचे होते. किलबर्न स्टेशनवरच्या तिकीट खिडकीतल्या बुवाला ते पिकॅडलीची तिकीटे मागतात. पुलं काय म्हणतात ते पुलंच्या शुद्ध तुपातील इंग्रजी उच्चारांमुळे त्या बुवाला काही केल्या समजेना. तो त्याच्या उच्चारात ,” मे ग्याॅ फाऊन” म्हणाला असे पुल सांगतात. पुलं अखेर चिडून त्याला आपल्या खणखणीत इंग्रजीत ” टू टिकेटस् आॅफ द ट्यूब रेल्वे फाॅर पिकॅडली” असे स्पष्टआवाजात सुनावतात. तरी तो प्रश्नार्थक मुद्रेनेच पाहात राहतो. अखेर पुल कागदावर इंग्रजीत “दोन पिकॅडली” असे लिहूनच त्याला देतात. तो बिचारा लागलीच “ओSS! यू मीन फिख्व्याड्ली!” असे म्हणून पटकन तिकिटे देतो. लक्षात आले असेल की फ्रान्समधून आलेल्या ह्या नविन पद्धतीच्या वर्तुळाकार गेंदेदार काॅलरला पिकॅडली म्हणत! 

पण ह्या पिकॅडलीचे स्पेलिंग Piccadills, pecadills, pickadailles, picardillas, अशा निरनिराळ्या २० तऱ्हेच्या “स्पेलिंग”मधून लिहिले जात असे ! अखेर Piccadilly असे लिहिण्याची पद्धत रुढ झाली. 

प्रारंभीचा piccadill शब्द शेक्सपिअरच्या काळातच १६०७ साली थाॅमस डेकरने लिहिलेल्या ‘नाॅर्थवर्ड हो’ ह्या नाटकात पहिल्यांदा आढळतो.नंतर काही काळाने ट्रॅफलगार स्क्वेअर जवळच एक मोठी इमारत Piccadilly Hall नावाने सर्रास ओळखली जाऊ लागली; कारण इमारतीच्या मालकाचा ह्या आधुनिक स्टार्च केलेल्या पाकळ्या पाकळ्यांच्या गोल काॅलर तयार करून विकण्याचा मोठा व्यापार होता.त्या व्यवसायाच्या कमाईतूनच त्याने ही इमारत बांधली होती. म्हणून साहजिकच ती Piccadilly Hall नावानेच ओळखली जाऊ लागली. हाईड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याचे Piccadilly नावही या हाॅलवरुनच पडले आहे. त्या काॅलरवरून नाही. 

पंधराव्या – सोळाव्या शतकात आज लोक खात नाहीत ते करकोचे, हंस, लांब मानेचे बगळ्यांसारखे पक्षी खात असत. गरीबांचे जेवण साधेअसे. जाडा भरडा पाव आणि चीझ्. हेच दोन पदार्थ त्यांच्या जेवणात असत. त्यात बदल नसे. ज्यांना हेही परवडत नसे ते फक्त भाजीपाल्यावर गुजराण करीत. 

बटाटा हा त्या काळी ब्रिटनला अगदी नविन होता. त्याची पाने दुसऱ्या काही विषारी वनस्पतींसारखी दिसत असल्यामुळेही बटाटा खायला कोणी धजत नसे. इंग्लंडमध्ये बटाटा खाण्यास सुरवात व्हायला अठरावे शतक उजाडावे लागले!  आपल्याकडेही सुरवातीस बटाटा आणि टोमॅटोकडे संशयानेच पाहिले जात असे.टोमॅटो तर मास मटनाशीच जोडला गेला होता ! 

काहीही असो पण गोड मात्र इंग्रजांना खूप आवडत असे. 

गरीब असो,मध्यम किंवा श्रीमंत असो सर्वांमध्ये साखर खाण्याचे प्रमाण प्रचंडापेक्षाही प्रचंड होते! साखर घातली नाही असा एकही पदार्थ त्यांनी शिल्लक ठेवला नव्हता. साखरेच्या तावडीतून मास-मच्छीमटण,अंडी हे मांसाहारी पदार्थही सुटले नव्हते. बरे, प्रत्येक वेळी, प्रत्येक पदार्थात साखर घालताना ‘अापला हात जगन्नाथ’ ह्या मापानेच घातली जात होती. दारूतही ती अशीच ओतली जाई. कोण किती साखर खातात त्यावर प्रतिष्ठा आधारली होती. साखर खाऊन कित्येकांचे दात काळे पडले होते.ज्यांचे तितकेसे काळे नसत ते कमीपणा येऊ नये म्हणून दातांना काळा रंग लावत! आपल्या मराठीतले “काळं कर तुझं तोंड”, ” त्याने तिथून तोंड काळे केले ” हे वाक्प्रचार तिकडे हे सन्मानादर्शक समजले गेले असते! 

आज साखरेवर पुर्णपणे नसला तरी बहिष्काराची फिकट सावली पडलीय असे वाटते. साखर म्हटली की “नको नको”, “अगदी कमी” हेच ऐकायला येते. कालाय तस्मै नम: म्हणावे का विज्ञानाची प्रगती म्हणायचे.

हे साखर खाण्याचे झाले. पण ‘पिण्या’चेही प्रमाण तितकेच होते. बिअर अतोनात प्याली जात होती. जीवनात हसणे, चांगल्या गोष्टींचा उपभोग घेणे करमणुकीचे कार्यक्रम पाहणे म्हणजे पाप समजणारे कडक सोवळ्याचे कर्मठ puritans पंथीय लोकही बिअरवर मात्र तुटून पडत! असे सांगतात की ह्या प्युरिटनांच्या म्होरक्याला जेव्हा न्यू इंग्लंडला आणले तेव्हा त्याच्या जहाजात चाळीस हजार लिटर बिअरशिवाय इतर दुसरे काही नव्हते! चर्च,मठात प्रत्येकाला दिवसाला चार लिटर बिअर मिळायची! 

तंबाखूच्या कथेवर तर विश्वास बसणार नाही इतकी ती थक्क करणारी आहे. तंबाखूच त्या काळी ‘व्यसनमुक्त’ होती! शेक्सपिअर लंडनला आला आणि पाठोपाठ तंबाखू एकवर्षाने आली. सुरवातीला ती एक चैनीची वस्तुच होती.पण शतकाच्या शेवटी ती गोरगरीबांचीही झाली. तंबाखूचा इतका प्रसार झाला की लंडनमध्ये तंबाखू आणि तिच्या पदार्थांची सात हजार दुकाने झाली होती! 

तंबाखू केवळ शौक म्हणून खाण्यासाठीच वापरली जात नसे. रोग प्रतिबंधकारक, बऱ्याच रोगांवर उपचार म्हणूनही ती वापरली जात असे.त्यामध्ये गुप्तरोगांचाही समावेश असायचा.अर्धशिशी,तोंडाची दुर्गंधी आणि त्याहीपेक्षा लंडनला सळो की पळो करून हजारो लोकांना मृत्युमुखी धाडणाऱ्या प्लेगसाठी प्रतिबंधक उपाय म्हणून नियमाने तंबाखू खाल्ली जात असे. तंबाखूचा शुभसंस्कार लहान मुलांवरही करत असत. इटनसारख्या शाळेत आज तंबाखू खाल्ली नाही म्हणून विद्यार्थ्यांना बदडून काढत! आपल्याकडेही तंबाखूची मिश्री अजूनही दात घासण्यासाठी खेड्यापाड्यात वापरत असतील.  पूर्वी तर शहरातही बरेच लोक तंबाखूने दाताला,तल्लीन होऊन,मालिश करत बसत ! 

विज्ञानाच्या दाराची कवाडे उघडू लागली तशी आज तंबाखूचे प्रस्थ जवळपास नाहीसेच झाले. 

शेक्सपिअरच्या आधी आणि त्याच्या काळातही समाज अनेक लहानमोठ्या स्तरांत विभागला होता. अर्थात सर्वात उच्चपदी राजाच होता. त्यानंतर येणाऱ्या सरदार, उमराव,जहागिरदार लष्करी अधिकारी आणि त्यानंतर उच्च स्थानवरचे धर्माधिकारी आणि नंतर वर्णी लागायची ती प्रतिष्ठितांची. ह्या सर्वांच्या खाली नंतर नागरिक. त्यातही प्रथम श्रीमंत जसे व्यापारी आणि त्या खाली मध्यम वर्ग. 

शेतकरी व सर्वांत खाली सामान्य कारागिर व त्यांच्याही खाली मजूर असायचा. वर जे सामाजिक थर सांगितले त्यातही अंतर्गत पायऱ्या होत्याच.थोडक्यांत फळ्याआणि चिरफळ्या अनेक होत्या. 

कोणी काय व कोणता पोशाख घालायचा, पेहराव काय कसा करायचा, कोणत्या प्रकारचे कापड व तेही कोणत्या वस्त्रासाठी वापरायचे ह्याचेही नियम होते! ज्याचे वार्षिक उत्पन्वीस पौड अाहे त्याला सॅटिनच्या कापडाचे जाकिटासारखे (Doublet) वापरायला परवानगी होती. पण सॅटिनचा gown पायघोळ अंगरखा किंवा कोटासारखे वस्त्र वापरता येत नसे. ज्याचे उत्पन्न शंभर पौडांपेक्षा जास्त असेल त्याला सर्व कपडे सॅटिनचे वापरायला मुभा होती. पण आतले जाकिटासारखे doublet फक्त मखमलचे वापरायला परवानगी होती. वरच्या पोशाखात मात्र मखमलीचा वापर करण्यास बंदी होती! मात्र निळ्या रंगाचे किंवा गडद जांभळट तांबड्या रंगाच्या मखमलीचे जाकिट वापरायला त्याला बंदी होती. कारण ह्या रंगाची मखमल फक्त ‘सर’ किताब असलेल्या शूर सरदारांसाठी व त्यांच्यापेक्षाही वरच्या दर्जाच्या सरदारांनाच वापरण्याचे अधिकार होते.  ह्यापेक्षाही चक्रावून टाकणारी मर्यादा-प्रतिबंध म्हणजे पोषाखातील एखाद्या विशिष्ठ वस्त्र प्रावरणासाठी किती कापड वापरायचे व त्याला किती दुमडून किती चुण्या असल्या पाहिजेत ह्याचेही निर्बंध होते!  हे निर्बंध असण्यामागे ह्या कापडाची आयात होत असे. त्यामुळे खूप पैसा बाहेरदेशी जात असे. त्यावर काही प्रमाणात बंधने घालावीत ह्यासाठी हे नियम असावेत असे काही तज्ञांचे मत आहे. 

राजे आणि त्यांचे अमर्याद अधिकार किती असू शकतात  ह्याची कल्पना ह्यावरून आणि कोणी काय, किती खावे ह्या सूचना वाचल्यावरही समजून येते. 

कुणाच्या जेवणात किती पदार्थ असावेत किंवा एकूण वाढप किती वेळा व्हावे ह्याचे नियमही सामाजिक, राजकीय स्थानावर ठरलेले होते. जसे चर्चच्या कार्डिनलला जेवणात नऊ पदार्थ किंवा नऊ वेळा वाढप करण्याची परवानगी होती. गरीबाला व त्याने कुणाला जेवायला बोलावले तर फक्त दोन पदार्थ आणि सूपची परवानगी होती. इंग्लडने पोपची सत्ता झुगारून दिल्यानंतर शुक्रवारी मास खाण्यावरची बंदी उठली. 

कायदा सुव्यवस्था व स्वच्छतेसंबंधीचे कायदेकानू कडक होते. खेडेगावाच्या पातळीवरही कुणाची बदके रस्त्यावर हिंडताना आढळली तर दंड होत असे. गाई घोड्याची शेण-लीद रस्त्यावरच नव्हे,कडेला जरी दिसली तरी दंड होत असे. ह्या शिक्षेतून शेक्सपिअरच्या बापाचीही सुटका झाली नाही. हेन्री स्ट्रीटवर सार्वजनिक ठिकाणी अशी घाण केल्याबद्दल त्याला एक शिलिंग दंड ठोठावला होता. त्या काळी एक शिलिंग ही मोठी रक्कम होती. ह्या शिक्षा प्लेग व इतर रोगराई पसरु नये यासाठी आवश्यकच होत्या. 

पुस्तकांचा प्रसार आणि खप वाढला होता. नाटकांना लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. व राज्यकर्त्यांचा उदार आश्रय लाभला होता. स्पेन विरुद्धचे युद्ध जिंकल्यामुळे लोकांत उत्साह होता. काव्य नाटके आणि एकूण साहित्यालाच चांगले दिवस आले होते. जगात आजही काव्यात्मक भाषा, प्रभावी संवाद, अत्यंत कमी व नेमक्या शब्दांत प्रसंग त्याची वेळ व पात्रे कोण हे शब्दातून डोळ्यांसमोर उभे करणारा,मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरिक्षण,नाट्यपूर्ण प्रसंग आणि हॅम्लेट,आॅथेल्लो, आयागो, ज्युलिेएट, यासारख्या पात्रांची अजरामर स्वगते, सुखात्मिका आणि शोकांतिका ह्या दोन्ही तऱ्हेची,आजही गाजत असलेली नाटके लिहून दिगंत कीर्ति मिळवणारा; आपल्या चतुरस्त्र प्रतिभेच्या बळावर लोकांचे आणि राजघराण्यातील परिवाराचे मन जिंकणारा; स्व कर्तृत्वावर राजाकडून आपल्यासाठी अभिमानाने मिरवावयाचे मानचिन्ह मिळवणारा; 

लंडनपासून शंभर मैलावर असलेल्या लहानशा स्ट्रॅटफर्ड- अपाॅन- एव्हन गावातील शेक्स्पिअरचे ह्याच काळात लंडनला आगमन झाले. इथेच त्याचा उत्कर्षही  झाला. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाचे नावही ठळकपणे जगाच्या नकाशावर आणले! 

[बिल ब्रायसनचे शेक्सपिअरवरील पुस्तक व काही जमवलेल्या माहितीच्या आधारे.] 

फुलेच फुले

 रेडवुड सिटी

फुलेच फुले 

परवा, कोल्हापूरहून निघणाऱ्या ‘ लोकमत’ आवृत्तीतील पळसाच्या फुलांचा सुंदर फोटो असलेला आणि त्या झाडाच्या गुधर्माविषयीचा एक चांगला लेख वाचायला मिळाला. 

बरेच वर्षांनी चित्रात का होईना पळसाची फुले पाहायला मिळाली. नोकरीतल्या फिरतीत ही लाल अग्निफुलांच्या ज्योतींनी बहरलेली झाडे पहायचे भाग्य लाभत होते. त्याला ज्वाळासारखी दाहक उपमा दिली असली तरी उन्हाळ्यात ती फार नेत्रसुखदायी होती. ती फुले पाहताना उन्हाळ्याचा रखरखीतपणा एकदम कमी होऊन तांबड्या रंगाचा गारवा जाणवायचा. आधीच उन्हाचा ताप, झळा आणि त्यातच बसमधल्या गर्दीमुळे वाढणारा घाम,प्रवाशांच्या चढ-उतारीची गडबड-गोंधळ, बडबडीची गडबड ही सर्व त्या रंगीत लाल फुलांमुळे कानामागे पडायचे. तहान लागली वाटत होती तीही भागलेली असायची ! साधारणत: गारवा हा हिरवा म्हटला जातो. पण पळसाची तांबडी फुलेही त्या त्या क्षणी थंड वाटत. अजिंठ्याच्या डोंगरकड्यावरून, चाळिसगाव-कन्नड घाटातून किंवा कधी सिन्नर तर लळिंगच्या डोंगराजवळून जाताना, तसेच यवतमाळच्या जंगलातून अकोल्याकडे येताना ह्या विस्तवाच्या फुलांचे सुभग दर्शन होई!  पळसाच्या तांबड्या फुलांचे हे आयते सर्वांसाठी भरवलेले प्रदर्शन पहायला मिळे!

ह्या तांबड्या लाल पळाशफुलांच्या जोडीनेच एका पिवळ्या फुलांनी लकडलेल्या झाडांची आठवण झाली. झाडांची म्हणायचे खरे पण ती फुले त्यावर लकडली होती म्हणून झाडे म्हणायची इतकेच. नाहीतर त्या पिवळ्या सोन्याच्या तितक्याच शांत पण तजेलदार, झळाळीत फुलांनीच आपल्या शोभेसाठी असावीत म्हणून उदार मनाने ठेवलेल्या चारदोन दिसणाऱ्या पानांच्या फांद्यामुळे त्यांना झाडे म्हणायची. त्या पिवळ्याधमक फुलांच्या घोसात कुणाचे लक्ष जाणार झाडाकडे? 

नगरला जाताना थोडे गावाबाहेरच पीडब्ल्यूडीच्या साहेबांच्या मुख्य आॅफिसच्या दहाबारा दगडी बैठ्या इमारती होत्या. आवार मोठे. त्या इमारतींच्या आसपास बाहेरील कुंपणाच्या भिंतीलगत  बहाव्याची म्हणजे कॅशियाची बरीच झाडे होती. ( कॅशिया म्हणजेच बहावा की निराळी ते नक्की माहित नाही) ती फुलली की सगळीकडे सोनेरी प्रकाश पडल्याचा भास व्हायचा. सूर्य ढगाआड गेलेला असला तरीही! सर्व आवार त्या फुलांच्या प्रकाशातच वावरत असायचे. काय ते पिवळे घोस! भरघोस हा शब्द त्यांच्यासाठीच किंवा त्या फुलांच्या घोसांनीच स्वत:साठी केला वाटावे असे ते लकडलेले असायचे! बरे, विशेष चमकदार वगैरे काही नव्हते. पण त्यांची ताजी टवटवीच उल्हसिता होती! 

फुलांचे झुबके त्यांच्या वजनाने खाली झुकलेले. वाऱ्यासंगे किंचित डोलणारे, जसे तरुणीच्या कानातील आभूषणांची मोहक आणि आकर्षक हालचाल वाटावी असे ते दृश्य दिसे. बाजारपेठेतील सोन्याचे दुकानदार भाजी फळांसारखे आपल्या पाट्या टोपल्या सोन्यांनी भरून बसलेत की काय असा तो पिवळा त्या आवारात व रस्याच्या कडेलाही बहरला होता! बालकवींनी पाहिले असते तर सुवर्ण चंपकाऐवजी तितक्याच आनंदाने ‘ सुवर्ण कॅशिया फुलला विपिनी ‘ म्हणाले असते!  

सोने पिवळे, ‘पिवळे पिवळे ऊन्ह कोवळे ‘ किंवा हळदीसारखा पिवळा हे फक्त त्या फुलांच्या घोसांचा पिवळा रंग लक्षात यावा एव्हढ्यासाठी. पण तो पिवळा किती व कसा,त्याच्या छटा शब्दात सांगणे कठिणच आहे. हे कॅशिया किंवा बहाव्याच्या फुलांचे रम्य दृश्य नगरला जाताना – तिथून घरी परतताना दिसायचे. 

हा पहिला बहर पाहिला त्या आनंदाच्या भरात मी घरी मुलांनाही ह्याचे पत्र लिहिले होते. त्यात,ओघात, संत निळोबारायांनी केलेल्या ज्ञानेश्वरांच्या आरतीतील   ‘सुवर्णपिंपळ असुमाय’ चाही उल्लेख होता. त्याच पत्राची नक्कल करून मी उत्साहाच्या भरात पीडब्ल्यूच्या मुख्य अभियंत्यानांही ते पाठवले होते! त्या साहेबांना मी त्यांच्या आवारातील हे फुलांचे सौदर्य नजरेस आणून दिले असे मला वाटले. त्यांच्या कार्यालयाने ही झाडे लावून दिलेल्या आनंदाबद्दल आभारही मानले. पण त्यांनी कुठला कोण वेडा माणूस म्हणत माझे नाव पत्ता ठाण्याच्या आणि येरवड्याच्या हाॅस्पिटलला कळवला असेल!  

पिवळ्या कॅशियावरून आणखी एका अविस्मरणीय पिवळ्या फुलांनी बहरलेल्या हजारो रांगांची आठवण झाली. ती सांगतो आणि हा पिवळ्या फुलांचा प्रसन्न रंगीत चष्मा बाजूला ठेवतो.

तो काळ सूर्यफुलांच्या लागवडीचा प्रारंभाचा  होता. करडई शेंगादाणे तीळ यांचे पिक वाढत नव्हते आणि त्यांचे भावही परवडणारे नव्हते. व तेलाचाही  त्या प्रमाणात भरपूर उतारा नसे. रशियाकडून सूर्यफुलांच्या तेलाची महति कळली. आपल्याकडेही त्याची शेती सुरु झाली.कुणाच्या बागेत एखाद दुसरे झाड दिसणाऱ्या सुर्यफुलांची आता राने बहरू लागली. 

माझ्या फिरतीत बीड जिल्ह्यातील तेलगावला गेल्यावर तिथे दुतर्फा सूर्यफुलांची मोठी पदके पाहिली! प्रथमच येव्हढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पिवळ्या पाकळ्यांच्या सहस्रकिरणांचे तेजोवलय मिरवित, ऐटीत उभे असलेल्या टपोऱ्या काळ्या डोळ्यांची ती फुले पाहिल्यावर थक्क झालो होतो. चौफेर,नजर फिरवावी तिकडे ही सोन्याची तळहाता एव्हढी मोठी पदके उन्हात हसत पाहताहेत असा भास होत होता! एकदा वाटले प्रभाशंकर कवडी इथे येऊन ह्या फुलांना डोळे देऊन गेले की काय? 

हे प्रभाशंकर कवडी कोण ? चित्रकार. त्यांची चित्रे किशोर मासिकात बरीच वर्षे त्यातील कथा लेख सजवत होती. इतर काही प्रसिद्ध मासिकात, काही जाहिरातीतही ते चित्रे काढीत. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे डोळे. ते मोठे टपोरे आणि गोल असत. बुबुळांच्या ह्या एकमेव आकार आणि ठसठशीतपणावरून व चेहऱ्यांच्या गोलाईवरून हे कवडींचे चित्र पटकन ध्यानात येई. सूर्यफुलांचाही मध्यगोल तसाच ठसठशीत आणि एकदम स्पष्ट नजरेत भरणारा! 

एका ओळीत उभे राहिलेल्या सूर्यफुलांच्या रांगाच्या रांगा हासुद्धा एक वेगळाच अपूर्व देखावा होता. आजूबाजूला काही नाही. घरेही तशी दूरच होती. सुर्यफुलांच्या शेकडो हजारो खड्या सैनिकांनी घातलेल्या वेढ्यात मी एकटा. बरोबर ड्रायव्हर. पाहातच राहिलो आम्ही! वरून एखादे विमान येत नव्हते; ते असते तर हिचकाॅकच्या North By Northwest ची आठवण झाली असती! 

महाशिवरात्रीचा उपवास

रेडवुड सिटी

जलदीची एक मैत्रिण अवंती दामले ही खेळाडूंच्या आहाराची तज्ञ आहे.तिने एक चांगला आहार, सबंध दिवसात क्रमाने आठ वेळा घ्यायचा अशा आठ ‘मील्सचा ‘ सांगितला आहे. ती मील्स वाचल्यावर……

“महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा आषाढी- कार्तिकी

सारख्या मोठ्या एकदशीचा उपवास असो…..

आणि ह्या प्रत्येक वाट्याबरोबर( वाटा, शिधा म्हणजेच ‘मील्स’ बरोबरीने) आपली दोन वेळा साधी भगर, तीन वेळा भगरेची खिचडी, ती नामांकित शेंगाचा कूट पेरलेली साखरेची चव आणि सहज म्हणून फिरवलेला लिंबाचा रस अशी बटाट्याची ढीगभर भाजी, निराळी साखर न घालावी लागणारी सावळ्या-गुलाबी रंगाचा रताळ्याच्या खिसाची टेकडी, आणि वाळकाच्या कोशिंबिरी शिवाय चव कशी येणार म्हणून तिही हवीच की; हे सर्व बसवायचे, त्याशिवाय चार म्हणत चाळीस खजुराच्या बिया म्हणजे बिया काढून उमलवलेले दोन रात्री तुपात भिजवलेले म्हणण्यापेक्षा थबथलेले चविष्ट खजूर; शेंगादाण्याची खसखस लावून केलेली ताकातली गरमा गरम आमटीची,मधून मधून म्हणायचे पण वारंवार भुरकुन मजा घेत तर कधी सढळ हाताने पुन्हा ताटात आलेल्या भगरीला तिने आंघोळ घालत मजा लुटायची; ह्यातही ती आमटी, नुकत्याच बाजारात आलेल्या ओल्या भुईमुगाच्या शेंगादाण्याची असली तर ती आनंदाने ठो ठो करतच प्यावी!

पण ओल्या शेंगांच्या ह्या आमटीमध्येही एक पाठभेद आहेच. बरेच जण त्या ओल्या शेंगा तशाच वाटून कुटुन मिक्सरून आमटी करतात. वेळ वाचतो पण चवीतही बचत होते. त्याऐवजी ते शेंगादाणे, त्यातील ओलेपणाचा जीवनरस पूर्ण जाऊ न देण्याइतपत हलकेच,बहुतेक शेंगांवर एकदोन, दृष्ट लागू नये म्हणून, गालबोटे उमटली न उमटली अशा भाजून घ्याव्यात.मग निश्चयाने सगळा मोह आवरून त्यांच्याकडे न पाहता कुटायवाटायमिक्सरुन घ्याव्यात. पण इतका निग्रह करूनही स्वत:ने, आणि इतरांनीही त्या मुठ मुठ घेतलेल्या असतातच. मग बाजारात पुन्हा पुन्हा एक दोन हेलपाटे घातल्याशिवाय प्रत्येकाला किमान सहा-सात वाट्या ती अमृतमधुर आमटी पिण्याचे भाग्य लाभत नाही. पण उपास घडणार म्हटल्यावर इतके तरी कष्ट घ्यावे लागणारच! आम्हाला ठीक होते. फाटक जवळच होते. आणि प्रत्येक हेलपाट्याला एक भाऊ होता.”

“मग एकादशी असली म्हणून काय झाले? दुपारी चार वाजता साबुदाण्याचे वडे डझन अर्धा डझन खाल्ले नाहीत तर उपास मोडेतो या धसक्याने, ते खायचे. बरे कुणी आग्रहही करत नाही म्हटल्यावर स्वत:च मोकळेपणाने ते आणखी दोन तीन फस्त करायचे”.

“रात्री बेताचे हलके म्हणून ताटाऐवजी मोठी ताटली शिगोशिग भरून,शुद्ध तुपातली उपासाचे लोणचे आणि वाटी सापडत नाही म्हणून वाडगाभर कवड्या दह्याच्य साथीने साबुदाण्याची खिचडी चवीचवीने दोन तीवेळा ती ताटली भर भरून खायची. रात्री झोपताना पोटात काहीतरी थंड जावे म्हणून दह्यादुधात भिजवलेल्या ‘ खारकांच्या सुमनमालां’ची मधुर आणि हविहवीशी वाटणारी खीर पोटच नव्हे तर आत्मारामही गार पडावा इतकी रिचवणे आवश्यकच असायचे.मग तेव्हढ्यात अरे इतके लंधन करूनही केळी खाल्ली नाहीत तर तो उपवास कसला ह्याची आठवण होते. मग कुरकुरत का होईना सहा सात लठलठ् केळी रिचवून नाईलाजाने झोपायचे. ”

“हे सगळे साधायचे म्हणजे अवंतीबाईंच्या आग्रहाचा मान ठेवून त्याची सगळी ‘मील्स’ ह्या माझ्या उपासाच्या नित्यनेमात बसवावी लागणारच.नाही म्हणून कसे चालेल! नव्या जुन्यांचा संगम करून निदान उपवास तरी करावाच. ”

“पण त्यामध्ये एक लहानसा बदल करावा म्हणतोय. त्यांच्या बऱ्याच मील्समध्ये, उदा. बदाम दोन अंजीर एक असे प्रमाण दिले आहे. ते बहुधा त्यांचे दामले आडनाव सिद्ध करण्यीसाठी असावे. साधारणत: मुठभर, एक दोन मुठी आणि डझन अर्धा डझन हे प्रमाण मला जास्त योग्य वाटते! ते वापरूनच त्यांच्या आरोग्यदायी ‘मील्स’सह उपवास करणार आहे. “

भगवद् गीता अ. १५ वा श्लोक १८, १९ आणि २० वा

रेडवुड सिटी 

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तम: ।

अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित: पुरुषोतम: ।।१८।।

मी क्षराच्याही पलीकडचा आणि अक्षरपुरुषाहूनही उत्तम पुरुष आहे. ह्या लोकीच्या सर्व व्यवहारात आणि वेदांमध्येही मी पुरुषोत्तम म्हणून प्रख्यात आहे. ।।१८।।

मी क्षर आणि अक्षरपुरुषापेक्षाही केवळ वेगळा नसून वेदोपनिषदातील संज्ञा वापरायची तर क्षराक्षर ह्या दोन्ही पुरुषांहूनही निरुपाधिक असलेला उर्ध्वतमच आहे. म्हणजे आकलन होण्यासाठी कठिण आहे.ह्या आणि इतर लोकींच्या सर्व पुरुषांहून मी श्रेष्ठ आहे हे तर निराळे सांगायला नको. 

यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् । 

स सर्वविदभजति मां सर्वभावेन भारत ।।१८ ।।

ज्याने सर्व मोह दूर सारून माझी उपासना केली व मला जाणून घेतले तो ज्ञानी होऊन सद्भावपूर्वक मलाच भजतो.।।१८।।

ह्या श्लोकात ज्ञान झालेला ज्ञानसाधक भक्त सर्वत्र सच्चिदानंदालाच पाहतो, मी ब्रम्हरुप झालो असेही त्याला ज्ञान होते. तरीही तो संपूर्णपणे परब्रम्ह रूपात लीन झाला, त्याचे द्वैताचे भान पूर्णपणे लोपले असे म्हणता येत नाही. महत्वाचा जो भाग ‘मद्रूप’ होण्यास अजून किंचित का होईना राहिले आहे. जसे सूर्योदयाची चाहूल लागली आहे. आकाशात झुंजुमंजूचे रंग आले आहेत, केवळ सुर्योदयाचाच अवकाश आहे, अशी त्या साधकाची स्थिती आहे. त्यासाठी ज्ञानोत्तर भक्तीची आवश्यकता सांगितली व मोहाचा इतकाही अंश नको असे म्हटले आहे. असे सर्व मोह दूर सारून (इथे  ‘मला आत्मज्ञान झाले’ हा अहंभावाचा मोह) भक्ती करणारा ‘मद्रुप’ होतो असे भगवंत म्हणतात. 

त्या मद्रुप ज्ञानी भक्ताचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली 

…….। मज पुरुषोत्तमाते धनंजया।

जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रे।।५५९।।

मला ज्ञानसुर्याच्या प्रकाशाने जाणल्यावर सगळे जग तो एकरुपाने पाहतो. सर्वांभूती परमेश्वरच पाहतो. मनात द्वैत भावनेचा अंशही नसतो. असे झाले की तोही मीच होतो. आकाशाने आकाशाला मिठीत घ्यावे तसे. 

ह्या श्लोकात मोह दूर सारून असे का म्हटले तर सर्व वासनांचा त्याग हा खरा संन्यास. ह्या अध्यायात विरक्ति वैराग्य दृढ व्हावे असे म्हटले आहे. त्याचाच हा पुनरोच्चार आहे. तसेच पुढच्या अध्यायात आसुरी संपत्तीचे वर्णन येणार आहे. आसुरी संपत्ती म्हणजे मोहांचा खजिनाच. त्याचे हे सुतोवाच असावे. मोहांचा त्याग केल्याशिवाय परमार्थात प्रवेश नाही! 

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।

एतदबुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत  ।।२० ।।

हे अर्जुना हे गुह्यातले गूढतम शास्त्र मी तुला सांगितले. हे नीट समजून घेतल्याने मनुष्य बुद्ध म्हणजे बुद्धिवान, जाणता आणि कृतकृत्य होईल.।।२०।।

भगवान म्हणतात, अशा तऱ्हेने क्षराक्षर पुरुषांना बाजूस सारून जो मी पुरुषोत्तम त्याची भक्ति करून तू मद्रूप हो. 

हा श्लोक पंधराव्या अध्यायाचा फलश्रुतीचा आहे. 

ह्या अध्यायात गीतेच्या तत्वज्ञानाचे सार आहे. त्यामुळे समारोप करताना ते गीतेचेही वैशिष्ठ्य सांगतात. 

सावचि बोलाचे नव्हे हे शास्त्र।पै संसारु जिणेते हे शस्त्र।

आत्मा अवतरविते मंत्रे। अक्षरे इये ।।५७०।।

हे गीता शास्त्र केवळ बोलण्या वाचण्याचा उपदेश नाही. त्यात सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर संसार जिंकण्याचे शस्त्रच आहे.( म्हणजे, गीतेत सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर संसारातील अडीअडचणी, संकटांवर मात करता येईल.) गीतेतील अक्षर न् अक्षर आत्म्याचे दर्शन घडवून देणारे मंत्रच आहेत.।।५७०।

माणसाने आपली चौकस बुद्धि, जिज्ञासा जर नेहमी जागृत ठेवली तर आपले ज्ञान वाढत राहते आणि ताजेही राहते. हा ज्ञानमार्गच आहे. आपली कामे लक्ष लावून मनलावून केली, आवडीचे न आवडणारे असा भेद न करता प्रत्येक काम आवडीचेच समजून ते आवडीने (Love’s Labour) ,आणि निस्वार्थीपणे केले ; आणि ते मलाच नव्हे तर सगळ्यांच्याच उपयोगी व्हावे ह्या भावनेने करणे, तर हा कर्मयोगच होईल; व्यवहारात अनावश्यक  अहंकार न दाखवता, नम्रतेने बोलणे चालणे केले, (पण तेहीअनाठायी न होऊ देता) तर ते भक्तीमार्गाचेच एक रूप होईल. 

परि हे बोलो काय गीता। जे हे माझी उन्मेषलता।

जाणे तो समस्ता। मोहा मुके।। ५८३।।

सेविली अमृत सरिता। रोग दवडूनि पंडुसुता।

अमरपणा उचितां। देऊनि घाली।।५८४।।

तैसी गीता हे जाणितलिया। काय विस्मयो मोह जावया।

परी आत्मज्ञानाने आपणपयां। मिळिजे येथ।।५८५।।

फार काय सांगू पार्था !  माझी ही ज्ञानलता गीता जो जाणून घेईल तो सर्वप्रकारच्या मोहातून मुक्त होईल व मद्रुप होऊन मला पावेल. माझ्या गीतारुपी अमृताचे जो सेवन करील तो फक्त रोगमुक्तच न होता अमरत्व पावेल. मग गीता यथार्थ जाणून घेतल्यावर त्याचा मोह दूर होईल ह्यात नवल नाही. तो आत्मज्ञानी होऊन मलाच येऊन मिळेल! ।।५८३-५८५।।

आचार्य विनोबा यांनी केलेल्या,  पंधराव्या अध्यायात सांगितलेल्या,पुरुषोत्तम योगाचे थोडक्यात आणि अचूक वर्णनाने आपण समारोप करू या. विनोबा म्हणतात, मत्सर अहंकार वगैरे दोषरहित बुद्धीने केलेल्या साधनेने,आत्मज्ञान प्राप्त होण्यात सर्वच कर्मांची समाप्ति होते.( काही करण्याचे राहात नाही). म्हणून ह्याला परमपुरुषार्थ म्हणतात. “आत्मज्ञानाची पूर्णावस्था म्हणजे पुरुषोत्तम योग !”

।। गुरुमहाराज की जय!।।

भगवद् गीता अ. १५वा, श्लोक १७वा

रेडवुड सिटी 

पंधराव्या श्लोकाच्या अखेरीस क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही पुरुषापेक्षाही श्रेष्ठ अशा उत्तम पुरुषाची ओळख पुढच्या श्लोकात आहे असे म्हटले होते. तो श्लोक आता वाचायला घेऊ या. 

उत्तम: पुरुषस्त्वन्य: परमात्मेत्युदाहृत:।

यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर:।।१७।।

 क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांहून वेगळा आणि उत्तम असा हा पुरुष आहे. त्याला परमात्मा म्हणतात. हा त्रैलोक्यात भरलेला आहे. तो अव्यय( कधीही कमी न होणारा म्हणजेच परिपूर्ण, नित्य) हा ईश्वर तिन्ही लोकांचे पोषण करतो. ।।१७।।

ह्या श्लोकात हा उत्तम पुरुष क्षराक्षरापेक्षा निराळा आहे याचे दोन तीन विशेष सांगितले आहेत. ते म्हणजे हा सर्वत्र भरलेला आहे. तो आहे. आणि आहे तसाच आहे. त्याचा व्यय होत नाही. शाश्वत आहे. तो सर्व विश्वाचा पोषक आहे. 

आपण ह्या परमात्म्याची महत्ता आतापर्यंतच्या सर्व अध्यायातून जाणून घेतली आहे. ती त्याच्या महत्वाच्या वैशिष्ठ्यातून माहिती करून घेतली आहेत. ह्या श्लोकातही त्यातील तीन वैशिष्ठ्ये आली आहेत.

परमात्म्याचे  ‘ एकोऽहं बहुस्याम’ या स्फुरणातून हे (स्फुरण हीच मूळ प्रकृति) अव्यक्त/ परा प्रकृतीत साम्यावस्थेत-समवाय- असलेल्या पृथ्वि आप तेज वायु आकाश आणि मन बुद्धि अहंकार हया आठही भागातून  (अपरा प्रकृति होउन) जड भूतमात्र नाना रुपनामात्मक भूतांची टाकसाळ उघडली. ही जड सृष्टी निर्माण झाली. उत्पत्ति संहाराचे चक्र सुरु झाले. पण अंती सर्व काही पुन्हा या अव्यक्तात (साम्यावस्थेतच) लीन होतात. हे ढोबळ मानाने लक्षात ठेवले म्हणजे क्षर व अक्षर पुरूष समजायला सोपे होते. कारण अपरा व परा प्रकृतींची लक्षणेच त्यांच्यात आहेत. मग पुरुष असे का म्हटले तर ह्या अध्यायात तत्वज्ञानच सांगायचे असल्यामुळे वेदान्ती  सर्वांमध्ये चैतन्य पाहतात. त्यामुळे इथे क्षरपुरुष व अक्षर पुरुष असे म्हटले आहे.( ही नावे सुद्धा अपरा प्रकृति व परा प्रकृतींच्या लक्षणांवरूनच दिली आहेत. हे आतापर्यंतच्या १६ श्लोकांवरून विशेषत: १६ व्या श्लोकाद्वारे ध्यानात आलेआहे.)  परमात्मा नावाचा पुरुषोत्तम श्रेष्ठ आहे हे लगेच लक्षात येते. 

परमात्मा नावाच्या उत्तम पुरुषाचे क्षराक्षर ह्या दोन्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व कसे आहे हे विविध मुद्द्यांवरूनआणखी स्पष्ट होईल. विपरित ज्ञानाच्या- म्हणजे खोट्यालाच खरे भासवणारे (सर्प-दोरी न्याय) जे ज्ञान- त्याच्या जागृति आणि स्वप्न ह्या दोन अवस्था ज्या अज्ञानत्वात  लुप्त होतात आणि जेव्हा ज्ञान होते तेव्हा हे अज्ञान त्या ज्ञानात लोपते .पण अंती ज्ञानही जिथे लीन होते, तो पुरुषोत्तम होय. ( आत्मसाक्षात्कार झाल्यावर ज्ञानही लुप्त होते. कारण आत्मज्ञानी त्या परमात्म्याशीच एकरूप झालेला असतो.) 

ज्ञानेश्वर माऊली हेच उपमा दृष्टांतातून पटवून देतात. 

पै ग्रासूनि आपुली मर्यादा। एक करीत नदीनदां।

उठी क्लपांती उदावादा। एकार्णवाचा।।५३३।।

तैसे स्वप्न ना सुषुप्ती। ना जागरची गोठी आथी।

जैसी गिळीली दिवोराती। प्रळय तेजें।।५३४।।

ऐसे आथि जे काही। ते तो उत्तम पुरुष पाही।

जे परमात्मा इहीं। बोलिजे नामी ।।५३६।।

नदी नद्या सर्व आपल्यात सामावून घेऊन त्या सर्व तोआपणच होऊन  अमर्याद होतो. आणि कल्पांतात  तर ह्या प्रळयात सर्वांचा विलय होऊन सर्वत्र एकच एक महाप्रळय सागर होतो; प्रळयाग्नीचे सर्वग्रासक महातेज दिवसरात्र सर्वच गिळून टाकते तसे इथे स्वप्न ना सुषुप्ति इतकेच काय जागृताचीही गोष्ट नाही. आत्मज्ञान्यांना ह्याचे ज्ञान, साक्षात्कार झाल्यावर त्यांच्या स्थितीचे, तिथे ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान ही त्रिपुटीही राहात नाही असे वर्णन केले जाते. म्हणजे ते सर्व काही ज्यात लीन होते, असे जे काही आहे, त्या उत्तम  पुरुषाला परमात्मा म्हणून ओळखले जाते!  मग आहे- नाहीअसे काहीच कळत नाही म्हणजेच सर्व द्वैताद्वैतही ज्यात लोप पावते असा जो स्वयंसिद्ध आहे तो उत्तम पुरुष म्हणजेच परमात्मा. ह्याला कोणतेही अभिधान देता येत नाही. आपल्या आकलनासाठी ह्या अध्यायाच्या आतापर्यंतच्या संदर्भात थोडक्यात सांगायचे तर तो व्यक्त-अव्यक्ताच्याही पलीकडे आहे. 

केवळ जीवात्म्याच्या सापेक्षतेतून त्याला परमात्मा म्हणायचे.तो अनिर्वाच्य आहे हेच खरे.त्याचे ज्ञान करून त्याचा प्रत्यक्षानुभव घेणे ही खरी साधना होय. 

त्याची प्राप्ती करून घेण्याच्या उपासना मार्गांचे विवेचन गीतेने आतापर्यंतच्या सर्व अध्यायात केले आहे. 

ध्यानयोग, बुद्धियोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्या चारी आत्मज्ञान करूनघेण्याच्या मार्गांची चर्चा मागील सर्व अध्यायातून झाली आहे. त्यातून ह्या तारी मार्गांचा समन्वय साधला आहे. सामान्यांसाठी प्रपंचातून वेळ काढून,  निष्ठापूर्वक श्रवण, भजन, कीर्तन, नामस्मरण, ह्यातून भगवंताशी सतत अनुसंधानात राहणे व शक्य असल्यास संतांच्या ग्रंथांचा अभ्यास, हे करावे. निष्ठा तळमळ वाढत जाईल तशी पुढची पायरी चढण्याची तयारी होईल. असा परमार्थाचा सोपान चढत राहणे हे आपल्या हाती आहे. ह्याने कल्याणच साधेल असे संत स्ंगतात. 

ह्या अध्यायात केवळ तत्वज्ञानाचीच चर्चा आहे. परमात्मा सर्वत्र आहे, त्याचे अमरत्व, जीवात्मा हा त्याचाच अंश आहे, सर्वांमध्ये तोच कसा भरून आहे, तो (इतर कुणाकडूनही) प्रकाशित होणारा नाही तर तोच सर्व प्रकाशक आहे, तो नियम्य नसून तोच त्रैलोक्याचा नियामक आहे गोष्टी ह्या अध्यायात आल्या अाहेत. अशा पुरुषोत्तमाला कोण भजणार नाही? जे ह्याचे हे स्वरूप जाणून घेण्यास केवळ उत्सुक नसून आतुर आहेत, ह्याला प्राप्त करून घेण्याची तीव्र तळमळ आहे असे पारमार्थिक ह्यालाच भजतात. 

पंधरावा अध्याय हा गीतेच्या शिकवणुकीचे सार  असलेल्या तत्वज्ञानाचा मानला जातो. त्या दृष्टीनेही सोळावा आणि सतरावा हे दोन्ही श्लोक महत्वाचे वाटतात. 

ह्या अध्यायात परमात्मा हा सगुण- निर्गुण, व्यक्त-अव्यक्त ह्यांच्याही पलीकडे आहे हे स्पष्ट केले आहे. तो प्रकाश देणाऱ्यांचाही प्रकाशक आहे. दिसत नाही म्हणून तो नाही असे अजिबात नाही. तो सर्वात आहे, पण तो दृश्य नाही. फुलातील सुगंध डोळ्यांना दिसत नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाही असे म्हणतो का? परमात्मा हा चराचरात प्राणीमात्रांत भरलेला आहे.पण तो दिसण्यापेक्षा अनुभवण्याचा विषय आहे. तो कसा अनुभवायचा त्या साठी गीतेने चार मार्गांचा परमार्थाचा प्रवास सांगितला आहे. ते चार मार्ग पुन्हा सांगण्याती आवश्यकता नाही. त्या त्या मार्गाचा अधिकारी होऊन हा परमेश्वर अनुभवता येतो हे गीतेने स्ंगितले आहे. 

 आपल्या नामदेवांनी, जनाबाईंनी, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी, एकनाथ, तुकाराम रामदास आणि इतर अनेक मराठी संतमहात्म्यांनी याची आपल्याला शपथपुर्वक खात्री दिली आहे. 

हा विचार बाळगून आपण ह्यानंतरचे श्लोक अभ्यासूया.