पंडितराज जगन्नाथ

मॅरिएटा

संस्कृत वाड.मयात, कालिदास आपल्या ‘शाकुंतल’  व ‘मेघदूत’ या काव्याने, भवभुति ‘उत्तररामचरित’या नाटकामुळे लोकप्रिय आहेत. राजा शूद्रक त्याच्या ‘मृच्छकटिक’नाटकाने सर्वमान्य झाला. जगन्नाथ पंडिताच्या वाट्याला त्यांच्या इतकी लोकप्रियता आली नसेल; पण अनेक विद्वानांच्या मते तो संस्कृत कवींचा मुकुटमणि आहे.

एका नावासारखी अनेक नावे असतात. हेच पाहा ना , जगन्नाथ पंडिताच्या काळाच्या सुमारासच दहा-बारा जगन्नाथ पंडित होऊन गेले. त्यातील एखाद दोन कविही होते.एका जगन्नाथाने महाभारतातील राजकारणावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. एक जगन्नाथ पंडित तर राजा होता. पण आपण आज ज्याची गोष्ट ऐकणार आहोत ती ‘गंगालहरी’ या अप्रतिम काव्याचा कर्ता पंडितराज जगन्नाथ याची.

इ.स १५५० साली आंध्र प्रदेशातील वेंगिनाड गावात जगन्नाथ पंडिताचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव पेरमभट्ट आणि आईचे नाव लक्ष्मी होते. जगन्नाथ पंडिताचेवडील पेरमभट्ट मोठे विद्वान होते. आपल्या वडिलांपाशीच जगन्नाथ पंडिताचे शिक्षण झाले. अत्यंत बुद्धिमान असलेला जगन्नाथ पंडित सर्व शास्त्रात पारंगत झाला. खऱ्याअर्थाने पंडित झाला. त्याला आपल्या वडिलांचा खूप अभिमान होता तितकाच त्यांच्याविषयी आदरही होता.’ रसगंगाधर ‘ या वाड.मयशास्त्रावरील प्रख्यात ग्रंथाच्याप्रस्तावनेतील एका श्लोकात त्याने आपल्या वडिलांना महागुरू म्हटले आहे.

जगन्नाथ पंडिताचे लग्न झाले. त्याच्या बायकोचे नाव भामिनी. ही भामिनी रसिक होती. मोठी विदुषीही होती. लग्नानंतरचा थोडा काळ काव्यशास्त्रविनोदात मोठ्याआनंदात गेला. थोडा काळ म्हणण्याचे कारण असे की भामिनी लवकर वारली. जगन्नाथ पंडिताने भामिनीविलास हे काव्य तिच्या स्मरणार्थ लिहिले आहे.

जगन्नाथ पंडिताची आई अगोदरच वारली होती. आणि आता भामिनीही गेली. वडीलही थोड्याच काळात वारले. संसार, कुटुंब या अर्थाने जगन्नाथ पंडित एकटा, एकाकीपडला. आपले नशीब उघडण्यासाठी, किंवा या एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्या ज्ञानाची,विद्वत्ततेची इथे अथवा जवळच्या कर्नाटक, महाराष्ट्रात कदर होतनाही, दखल घेतली जात नाही या भावनेतूनही असेल, पण जगन्नाथ पंडित उत्तरेकडे निघाला.

जयपुरचा राजा भगवानदास याने त्याला आश्रय दिला. जगन्नाथ पंडिताने पाठशाळा काढली. त्याच्या हाताखाली शिकून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्यागुरुची कीर्ति सर्वदूर पसरवली. त्या काळी विद्वान शास्त्री पंडितांच्या वादसभा, चर्चा होत असत. त्यात पंडित जगन्नाथ अनेक वेळा विजयी झाला.

जगन्नाथ पंडित नुसताच व्युत्पन्न शास्त्री पंडित नव्हता. तो मोठा रंगेल वृत्तीचा रसिक कविही होता. त्याला आपल्या विद्वत्तेचा, काव्यप्रतिभेचा अभिमानआणि आत्मविश्वासहोता. जिथे विद्वत्ता प्रतिभा अभिमान आत्मविश्वास असतो त्याबरोबर अहंकारही येतो. तसा त्याच्या आत्मविश्वाला अहंकाराचा सुगंधही होता. अहंकाराला सुगंधम्हणायचे? जगन्नाथ पंडिताच्या बाबतीत तसे म्हणायला हरकत नाही. कारण तो कवि हृदयाचा होता.हा अहंकार त्याच्या काव्यप्रतिभेपुरता मर्यादित होता.

पंडित जगन्नाथाच्या आत्मविश्वासाचे उदगार त्याच्या ‘रसगंगाधर’ ग्रंथात पाहायला मिळतात. तो एके ठिकाणी म्हणतो,” प्रसाद या गुणाचे उत्तम उदाहरण म्हणजे माझीबहुतेक सर्व काव्ये”. रसगंगाधरमध्ये विविध रसांची उदाहरणे देतानाही हा बहुतेक स्वत:ची काव्येच देतो! त्याबद्दल तो म्हणतो की,” मी इतरांच्या कविता कशाला घेऊ?आपल्यातच कस्तुरी असणारा मृग दुसऱ्या फुलांचा वास कशाला घेईल?” गंगालहरीतही एके ठिकाणी जगन्नाथ या नामाचा उपयोग त्याने स्वत:चे नाव आणि ‘मी जगाचानाथ’ असे दोन्ही अर्थ होतील अशा तऱ्हेने करून आपला रुबाब दाखवला आहे!

ह्या बरोबरच त्त्याची गुलाबी रंगेल वृत्तीही एक मोठा विशेष आहे. गंगालहरीसारख्या आर्तमधुर भक्तीपर काव्यातही ‘नृपतिरमणींनां कुचतटी’, ‘ सुरस्त्री वक्षोज’ अशा गोष्टीआढळतात. पण तरीही त्यातील भक्तिरसाची गोडी, भक्ताची आर्तता यत्किंचितही कमी होत नाही.

जगन्नाथ पंडिताच्या काळात अकबर बादशहा हिंदुस्थानचा सम्राट होता. तो सुसंस्कृत होता. रत्नपारखी होता. म्हणूनच त्याच्या दरबारातील मंत्री,सल्लागारांना नवरत्नेम्हणत. त्याचा दरबार नवरत्न दरबार म्हणूनच ओळखला जात होता.

अकबराने सर्व धर्मातील पंथातील चांगल्या आणि सर्वमान्य अशा तत्वांच्या आधारे एक नविन धर्म, ‘ दिने-इलाही’ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. एकदा एक विद्वानमौलवी अकबराला म्हणाला की तो एखाद्या विद्वान हिंदु पंडिताशी कुराणाच्या आधारे धर्म चर्चा करायला तयार आहे. अकबराने अशा हिंदु पंडिताचा शोध घ्यायलासांगितले. सगळ्यांकडून अकबराला जगन्नाथ पंडिताचेच नाव ऐकायला येऊ लागले.

अकबराने जयपुरच्या नरेशाला जगन्नाथ पंडिताला दिल्लीला पाठवण्याचा सांगावा धाडला. दिल्लीच्या बादशहाचा निरोप म्हणजे हुकुमच की! शिवाय जयपुरच्याराजाची बहिण अकबराची एक राणी होती. अकबराला तिच्यापासून एक मुलगी झाली होती. ती बुद्धीमान आणि सुंदर होती. अकबराने लाडाने तिचे नाव लवंगी ठेवलेहोते. कुनिष्का असे तिचे दुसरेही एक नाव होते असे म्हणतात.

दिल्लीला जाण्याअगोदर जगन्नाथ पंडिताने कुराणाचा अभ्यास केला. दिल्ली दरबारी पोचल्यावर जगन्नाथ पंडिताची आणि त्या मौलवीची बरीच चर्चा होत असे. चर्चेतूनकाय निष्पन्न झाले त्याची कुठेही नोंद नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *